शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जलाशयांत केवळ १३.४३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:18 IST

जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोन प्रकल्पात ठणठणाट : पाटबंधारेच्या संबंधितांना कडक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.धाम नदी प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा आंजी (मोठी) या गावासह वर्धा शहर आणि वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांना केल्या जातो. मागील महिन्यात सुकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धेकरांसह वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील नागरिकांना करण्यात आला. परंतु, सध्या या प्रकल्पासह मदन प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असून ते कोरडे झाले आहेत.आजमितीला धाम प्रकल्पात केवळ ४.८६ टक्केच उपयुक्त जलसाठा असून या पाण्याचे बिगर सिंचनासाठी नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी जून २०१९ अखेरपर्यंत पुरवायचे असल्याने तसेच तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद वर्धा तसेच आदी विभागांनी धाम प्रकल्पातून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून त्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.महिन्यात एकदाच सोडणार पाणीजून २०१९ पर्यंत धाम प्रकल्पातून २५ ते ३० रोजी दरम्यान एकदाच पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी वेळीच पाण्याची उचल करून त्याची विशिष्ट पद्धतीने साठवणूक करणे क्रमप्राप्त आहे. कुठल्याही परिस्थितीत महिना पूर्ण व्हावयाच्या पूर्वी पाणी सोडण्यात येणार नाही, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई