शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जलाशयांत केवळ १३.४३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:18 IST

जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देदोन प्रकल्पात ठणठणाट : पाटबंधारेच्या संबंधितांना कडक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील १३ जलाशयात सध्या केवळ १३.४३ टक्केच उपयुक्त जलसाठा असून दोन प्रकल्प कोरडे झाले आहेत. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन केले असले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा कडक सूचना पाटबंधारे विभागाकडून संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.धाम नदी प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा आंजी (मोठी) या गावासह वर्धा शहर आणि वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांना केल्या जातो. मागील महिन्यात सुकळी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पुरवठा वर्धेकरांसह वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील नागरिकांना करण्यात आला. परंतु, सध्या या प्रकल्पासह मदन प्रकल्पात उपयुक्त जलसाठा निरंक असून ते कोरडे झाले आहेत.आजमितीला धाम प्रकल्पात केवळ ४.८६ टक्केच उपयुक्त जलसाठा असून या पाण्याचे बिगर सिंचनासाठी नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणी जून २०१९ अखेरपर्यंत पुरवायचे असल्याने तसेच तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद वर्धा तसेच आदी विभागांनी धाम प्रकल्पातून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल करून त्याचा काटकसरीनेच वापर करावा, अशा सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.महिन्यात एकदाच सोडणार पाणीजून २०१९ पर्यंत धाम प्रकल्पातून २५ ते ३० रोजी दरम्यान एकदाच पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी वेळीच पाण्याची उचल करून त्याची विशिष्ट पद्धतीने साठवणूक करणे क्रमप्राप्त आहे. कुठल्याही परिस्थितीत महिना पूर्ण व्हावयाच्या पूर्वी पाणी सोडण्यात येणार नाही, असेही पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई