शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदात संशोधनाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : माता, बाल संगोपनावरील परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व अनुसंधान केंद्र येथील बालरोग, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र तसेच सामुदायिक औषधीशास्त्र विभागाद्वारे सावंगी दत्ता मेघे सभागृृहात आयोजित माता व बाल संगोपनावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारोहात ते बोलत होते. यावेळी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, प्रा. डॉ. सुभाषचंद्र वार्ष्णेय, डॉ. श्याम भुतडा, विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रीती देसाई, अनुसंधान निदेशक डॉ.रमेश देवल्ला, डॉ. वैशाली कुचेवार, डॉ. रेणु राठी, डॉ. श्रीहरी, डॉ. प्रेमकुमार बडवाईक, डॉ. प्रतीक्षा राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अभिमत विद्यापीठाद्वारे वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील माजी अधिष्ठाता व निदेशक डॉ. प्रेमवती तिवारी यांना ‘वत्सला’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रथम सत्रात डॉ. चारू बन्सल यांनी ‘गर्भिणीतील आहार व योग’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेचे डॉ. गोविंद रेड्डी, डॉ. रेणू राठी यांनी सुप्रजनन आणि गरोदरपणातील माता तसेच नवजात बालकांची काळजी, आहार-विहार व आयुर्वेदीय औषधाद्वारे विविध आजार सुयोग्यरीत्या प्रतिबंधित करण्याबाबत मार्गदर्शन केले.परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील डॉ. सुजाता कदम यांनी ‘गर्भथान संस्कारातून स्वस्थ बालक निर्माण होण्यापूर्वी घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय महाविद्यालय, वाराणसी येथील बालरोग विभाग प्रमुख डॉ. बी. एस. सिंग यांनी आयुर्वेदाद्वारे नवजात बालकांची घ्यावयाची काळजी यावर सैद्धांतिक व शास्त्रीय विवेचन केले. समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी, आयुर्वेदातील माता आणि बाल संगोपन क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे अनुसंधान पत्रिकांमध्ये प्रकाशन करावे, असे आवाहन केले.या दोन दिवसीय परिसंवादात देशातील विविध राज्यातून सुमारे २५० आयुर्वेद अभ्यासक सहभागी झाले होते. परिसंवादात एकूण ६७ शोधनिबंध आणि ३४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. यात पूर्णिमा घरी, श्यामलाल एस., दिव्या बाभूळकर, सुधा दसना, हर्षा गायकवाड, समीर घोलप, शिवनी इंगोले, नीलेश इंगळे, अस्मिता भद्रे, अवंती बोडखे यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पुरस्कार देण्यात आले. पोस्टस सादरीकरणात चेतन भालकर, सुनंदा चतुर्वेदी, हर्षा गायकवाड यांना उत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार देण्यात आला. तर वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून मुस्कान खान हिला प्रथम, तर कुमार विक्रम साहू याला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. परिसंवादाच्या आयोजनात धूतपापेश्वर, पेन्टा केअर, नागार्जुन फार्मा यांचे सहाय्य लाभले.