शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

आयुर्वेदात संशोधनाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : माता, बाल संगोपनावरील परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व अनुसंधान केंद्र येथील बालरोग, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र तसेच सामुदायिक औषधीशास्त्र विभागाद्वारे सावंगी दत्ता मेघे सभागृृहात आयोजित माता व बाल संगोपनावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारोहात ते बोलत होते. यावेळी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, प्रा. डॉ. सुभाषचंद्र वार्ष्णेय, डॉ. श्याम भुतडा, विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रीती देसाई, अनुसंधान निदेशक डॉ.रमेश देवल्ला, डॉ. वैशाली कुचेवार, डॉ. रेणु राठी, डॉ. श्रीहरी, डॉ. प्रेमकुमार बडवाईक, डॉ. प्रतीक्षा राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अभिमत विद्यापीठाद्वारे वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील माजी अधिष्ठाता व निदेशक डॉ. प्रेमवती तिवारी यांना ‘वत्सला’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रथम सत्रात डॉ. चारू बन्सल यांनी ‘गर्भिणीतील आहार व योग’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेचे डॉ. गोविंद रेड्डी, डॉ. रेणू राठी यांनी सुप्रजनन आणि गरोदरपणातील माता तसेच नवजात बालकांची काळजी, आहार-विहार व आयुर्वेदीय औषधाद्वारे विविध आजार सुयोग्यरीत्या प्रतिबंधित करण्याबाबत मार्गदर्शन केले.परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील डॉ. सुजाता कदम यांनी ‘गर्भथान संस्कारातून स्वस्थ बालक निर्माण होण्यापूर्वी घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय महाविद्यालय, वाराणसी येथील बालरोग विभाग प्रमुख डॉ. बी. एस. सिंग यांनी आयुर्वेदाद्वारे नवजात बालकांची घ्यावयाची काळजी यावर सैद्धांतिक व शास्त्रीय विवेचन केले. समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी, आयुर्वेदातील माता आणि बाल संगोपन क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे अनुसंधान पत्रिकांमध्ये प्रकाशन करावे, असे आवाहन केले.या दोन दिवसीय परिसंवादात देशातील विविध राज्यातून सुमारे २५० आयुर्वेद अभ्यासक सहभागी झाले होते. परिसंवादात एकूण ६७ शोधनिबंध आणि ३४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. यात पूर्णिमा घरी, श्यामलाल एस., दिव्या बाभूळकर, सुधा दसना, हर्षा गायकवाड, समीर घोलप, शिवनी इंगोले, नीलेश इंगळे, अस्मिता भद्रे, अवंती बोडखे यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पुरस्कार देण्यात आले. पोस्टस सादरीकरणात चेतन भालकर, सुनंदा चतुर्वेदी, हर्षा गायकवाड यांना उत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार देण्यात आला. तर वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून मुस्कान खान हिला प्रथम, तर कुमार विक्रम साहू याला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. परिसंवादाच्या आयोजनात धूतपापेश्वर, पेन्टा केअर, नागार्जुन फार्मा यांचे सहाय्य लाभले.