शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
4
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
5
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
6
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
7
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
8
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
9
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
10
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
11
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
12
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
13
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
14
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
15
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
16
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
17
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
18
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
19
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
20
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर

आयुर्वेदात संशोधनाला वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:58 IST

आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्देवेदप्रकाश मिश्रा : माता, बाल संगोपनावरील परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णालय व अनुसंधान केंद्र येथील बालरोग, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र तसेच सामुदायिक औषधीशास्त्र विभागाद्वारे सावंगी दत्ता मेघे सभागृृहात आयोजित माता व बाल संगोपनावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन समारोहात ते बोलत होते. यावेळी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, महाविद्यालयाचे समन्वयक व्ही. आर. मेघे, प्रा. डॉ. सुभाषचंद्र वार्ष्णेय, डॉ. श्याम भुतडा, विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रीती देसाई, अनुसंधान निदेशक डॉ.रमेश देवल्ला, डॉ. वैशाली कुचेवार, डॉ. रेणु राठी, डॉ. श्रीहरी, डॉ. प्रेमकुमार बडवाईक, डॉ. प्रतीक्षा राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अभिमत विद्यापीठाद्वारे वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठातील माजी अधिष्ठाता व निदेशक डॉ. प्रेमवती तिवारी यांना ‘वत्सला’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रथम सत्रात डॉ. चारू बन्सल यांनी ‘गर्भिणीतील आहार व योग’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेचे डॉ. गोविंद रेड्डी, डॉ. रेणू राठी यांनी सुप्रजनन आणि गरोदरपणातील माता तसेच नवजात बालकांची काळजी, आहार-विहार व आयुर्वेदीय औषधाद्वारे विविध आजार सुयोग्यरीत्या प्रतिबंधित करण्याबाबत मार्गदर्शन केले.परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील डॉ. सुजाता कदम यांनी ‘गर्भथान संस्कारातून स्वस्थ बालक निर्माण होण्यापूर्वी घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर शासकीय महाविद्यालय, वाराणसी येथील बालरोग विभाग प्रमुख डॉ. बी. एस. सिंग यांनी आयुर्वेदाद्वारे नवजात बालकांची घ्यावयाची काळजी यावर सैद्धांतिक व शास्त्रीय विवेचन केले. समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी, आयुर्वेदातील माता आणि बाल संगोपन क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शोधनिबंधांचे अनुसंधान पत्रिकांमध्ये प्रकाशन करावे, असे आवाहन केले.या दोन दिवसीय परिसंवादात देशातील विविध राज्यातून सुमारे २५० आयुर्वेद अभ्यासक सहभागी झाले होते. परिसंवादात एकूण ६७ शोधनिबंध आणि ३४ पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले. यात पूर्णिमा घरी, श्यामलाल एस., दिव्या बाभूळकर, सुधा दसना, हर्षा गायकवाड, समीर घोलप, शिवनी इंगोले, नीलेश इंगळे, अस्मिता भद्रे, अवंती बोडखे यांना उत्कृष्ट शोधनिबंधाचे पुरस्कार देण्यात आले. पोस्टस सादरीकरणात चेतन भालकर, सुनंदा चतुर्वेदी, हर्षा गायकवाड यांना उत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार देण्यात आला. तर वक्तृत्व स्पर्धेत १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून मुस्कान खान हिला प्रथम, तर कुमार विक्रम साहू याला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला. परिसंवादाच्या आयोजनात धूतपापेश्वर, पेन्टा केअर, नागार्जुन फार्मा यांचे सहाय्य लाभले.