शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पीक कर्जविषयक समस्यांची सोडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:50 PM

आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देआमदार केळझर बँक शाखेला भेट : चार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चालतो कारभार

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : आमदार पंकज भोयर यांनी स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेला भेट देवून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत येत असलेल्या अडचणीची सोडवणूक शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने करून घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. शाखा व्यवस्थापक पवन राईकवार यांच्या आमदारांना बँकेतील कामकाजाबाबत माहिती दिली.सध्या पावसाळी हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांची कर्ज घेण्यासाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. केळझर येथील बँकेत दहा गावाचे जवळपास ११ हजार खातेधारक आहे. येथे ४२३ शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असून टप्प्याटप्प्याने त्याची यादी येत असल्याने यादीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती दिली जात आहे. पुढील यादीत आणखी आणखी २०० शेतकऱ्यांचे नावे येतील अशी माहिती शाखा व्यवस्थापक राईकवार यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिली. शेतकऱ्यांवरील कर्ज हे शासनाकडून माफ होत असून आम्हाला फक्त व्याज माफ करण्याचेच अधिकार आहेत. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबी समजून घेतल्या तर काम अधिक सोईस्कर ठरेल. असे यावेळी आमदारांना बँक प्रशासनाने सांगितले. या शाखेत शाखा व्यवस्थापक, उप शाखा व्यवस्थापक यांच्यासह संगणक चालक व रोखपाल असे चार कर्मचारी आहेत. यांच्या सहायाने कर्जाची सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी शेतकरी आशिष ईरुटकर, विलास नगराळे, वडगांव जंगली ,बाबाराव नरड, वासुदेव नखाते यांच्याशी आमदार डॉ. भोयर यांनी चर्चा केली. व कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास सेलू तहसील कार्यालयात संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी आमदार पंकज भोयर सोबत सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने व विजय खोडे, विलास वरटकर, अशोक कलोडे, चंद्रशेखर वंजारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी अजूनही जिल्ह्यात १३ ते १४ हजार शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाही. त्यांनी अर्ज भरले होते. त्यामुळे आता पीक कर्ज घेतांना त्यांना बँकेत त्रास सहन करावा लागत आहे. बँकेकडे मनुष्य बळाची कमतरता असल्याने शेतकऱ्यांना बरेचवेळा परत जावे लागत आहे.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रPankaj Bhoyarपंकज भोयर