शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

‘त्या’ तिघांचा अहवाल ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली होती. तर सोमवारी आणखी २० व्यक्तींना होम क्वारंटाईन मधून मुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसावधगिरी बाळगणे क्रमप्राप्त; पण बेफिकर दिसताहेय वर्धेकर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध कार्य युद्धपातळीवर केले जात आहेत. यापूर्वी चार व्यक्तींचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर रविवारी आणखी तीन संशयीतांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. सदर अहवालानुसार प्रकृती अस्थिर असलेले हे तिन्ही व्यक्ती कोरोना बाधित नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कोरोना बाधित क्षेत्रातून वर्धा जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती वर्धा जिल्ह्यात आल्याची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. त्यापैकी ५४ व्यक्तींची रविवारपर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली होती. तर सोमवारी आणखी २० व्यक्तींना होम क्वारंटाईन मधून मुक्त करण्यात आले आहे. तर उर्वरित ३५ व्यक्ती सध्या गृह निगराणी (होम क्वारंटाईन) मध्ये आहेत. त्यांच्यात कोरोनाची कुठली लक्षणे आढळतात काय यावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. सुरूवातीला चार व्यक्तींच्या घशातील द्रवासह रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले. तर रविवारी आणखी तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेही निगेटिव्ह आले आहे. एकूणच वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिवाय जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. परंतु, रविवारच्या जनता कर्फ्यूनंतर सोमवारी वर्धेकर बेफिकीर असल्यागत घराबाहेर निघाल्याचे दिसून आले.कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक वर्धेकराचे सहकार्य सध्याच्या आपातकालीन स्थितीत कर्तव्य बजावणाºया अधिकाºयांना मिळाले नाही तर नागरिकांना घरात बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कठोर भुमिका घ्यावीच लागणार असल्याचे सांगण्यात आले.रविवारी जनता कर्फ्यूला वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्पूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांची गर्दी न होऊ देणे तसेच एका नागरिकाचा दुसºया नागरिकासोबत संपर्क न येऊ देणे हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कठोर पावले उचलण्यात येईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.रविवारी तीन व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या व देण्यात येत असलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या