शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:22 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावर होणार सन्मान : आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली यंत्रणा

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अंत्यत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणारी ही यंत्रणा शेतीसाठी लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनात या यंत्रणेची दखल घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आता राज्यस्तरावर ही यंत्रणा प्रदर्शनासाठी पाठविली जाणार आहे.शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासोबतच वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान होण्याच्या संकट येते. अनेकवेळा माकडे, रानडुकर, पक्षी आदी शेतमाल उपडून फेकून देतात. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त होतो. ही बाब यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी या उद्देशाने आयअीआयतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टमी प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून रात्री दिवसा वन्यप्राण्यांपासून शेतामालाचा बचाव करता येणार आहे.शेतात दिवसा माकडांच्या टोळ्या फिरतात. तसेच नुकतेच पेरलेले बियाणे व हरभऱ्याचे दाणे टिपणाºया पक्ष्यांपासूनही बचाव करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या तंत्र प्रदर्शनात या प्रणालीचे अवलोकन करून तिची राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली आहे.काय आहे प्रणालीसिंगल फेज एसी सप्लाय तसेच इन्व्हर्टर बॅटरी किंवा सौर उर्जेवर चालण्यास सक्षम असणारी ही प्रणाली आहे. यामध्ये संपूर्ण शेताला कुंपण करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीच्या कक्षेत जंगली श्वापद आल्याबरोबर ते दूर पळविण्यासाठी स्वयंचलित प्रणाली पूर्णपणे आपोआप कार्यान्वित होते. हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यासाठी मोठ्या खर्चाची गरज नाही.