शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:22 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावर होणार सन्मान : आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केली यंत्रणा

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला वन्यप्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्रास आहे. या त्रासातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी वर्धा येथील तलमले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अंत्यत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करणारी ही यंत्रणा शेतीसाठी लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या विभागीय तंत्र प्रदर्शनात या यंत्रणेची दखल घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आता राज्यस्तरावर ही यंत्रणा प्रदर्शनासाठी पाठविली जाणार आहे.शेतकऱ्यांवर अस्मानी संकटासोबतच वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान होण्याच्या संकट येते. अनेकवेळा माकडे, रानडुकर, पक्षी आदी शेतमाल उपडून फेकून देतात. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रस्त होतो. ही बाब यातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी या उद्देशाने आयअीआयतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट अ‍ॅग्रीकल्चर सिक्युरिटी सिस्टमी प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून रात्री दिवसा वन्यप्राण्यांपासून शेतामालाचा बचाव करता येणार आहे.शेतात दिवसा माकडांच्या टोळ्या फिरतात. तसेच नुकतेच पेरलेले बियाणे व हरभऱ्याचे दाणे टिपणाºया पक्ष्यांपासूनही बचाव करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही लाभदायक ठरणारी आहे. नागपूर येथे झालेल्या तंत्र प्रदर्शनात या प्रणालीचे अवलोकन करून तिची राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली आहे.काय आहे प्रणालीसिंगल फेज एसी सप्लाय तसेच इन्व्हर्टर बॅटरी किंवा सौर उर्जेवर चालण्यास सक्षम असणारी ही प्रणाली आहे. यामध्ये संपूर्ण शेताला कुंपण करण्याची आवश्यकता नाही. या प्रणालीच्या कक्षेत जंगली श्वापद आल्याबरोबर ते दूर पळविण्यासाठी स्वयंचलित प्रणाली पूर्णपणे आपोआप कार्यान्वित होते. हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यासाठी मोठ्या खर्चाची गरज नाही.