शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तथा वीज बिलातून मुक्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:43 IST

संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करा, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा, कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या,....

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : मोर्चा काढून दिले तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्तता करा, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा, कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा द्या, कपाशीवरील गुलाबी, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना त्वरित २० हजार रुपये एकरी मदत करा, नान एफएक्यू प्रतीच्या सोयाबीनची आधारभूत किंमत त्वरित जाहीर करून शासकीय खरेदी सुरू करा आदी मागण्या शेतकरी संघटनेने केल्या. यासाठी मोर्चा काढून तहसीदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी संघटनेच्यावतीने दीपाली मंगल कार्यालयात युवा परिषद घेण्यात आली. परिषदेला विदर्भवादी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष शैलजा देशपांडे, माजी राज्य कार्यकारिणी सदस्य मधुसुदन हरणे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य चंद्रमणी भगत, गजानन निकम, निळकंठ घवघवे, ग्राहक पंचायतचे डॉ. नामदेव बेहरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल धनवट यांनी शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेगाव येथे होणाºया मेळाव्याला लाखोंच्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन केले. माजी आमदार सरोज काशीकर यांनी समुद्रपूर-हिंगणघाट हे एकेकाळी शेतकरी संघटनेचे बालेकिल्ले होते. आज मला ते सर्व कार्यकर्ते येथे दिसत आहे. यापुढील सर्व आंदोलने आणि दिलेले आदेश योग्यरित्या पाळले जातील, याचा मला विश्वास आहे. शेतकºयांना यापूढे शेतमालाचे योग्य भाव मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुट होऊन आपल्या मागण्या पदरात पाडता येतील, असे सांगितले. अ‍ॅड. चटप यांनी वेगळे विदर्भ राज्य झाल्याशिवाय शेतकºयांचे भले होऊ शकत नाही. म्हणून शेतकºयांनी वेगळ्या विदर्भासाठी ताकदीने उभे राहावे, असे आवाहन केले.युवा परिषदेत जिल्हा महिला आघाडी शेतकरी संघटना अध्यक्षपदी जि.प. सदस्य ज्योती निकम, जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी अरविंद राऊत, उपाध्यक्ष युवा आघाडी पदी गणेश मुटे यांची नियुक्ती करण्यात आली. युवा परिषदेला जाताना नेत्यांना मोटार सायकल रॅलीने वाघेडा चौक ते दिपाली मंगल कार्यालयापर्यंत नेण्यात आले. सभेनंतर मोर्चाद्वारे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यात बाजारातील शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी कृषी मालाची ए, बी, सी अशा तीन ग्रेडची आधारभूत किंमत जाहीर करावी. मागील वर्षी जाहीर केलेली सोयाबीनची २०० रुपये प्रती क्विंटलचे अनुदान त्वरित वितरित करावी. वीज बिल थकबाकीपोटी कृषी पंपाजी जोडणी खंडित करू नये. वन्यप्राणी कायद्यात साप या प्राण्याचा समावेश करून सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणाºया नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनाचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी डॉ. हेमंत इसनकर, अजाब राऊत, जीवन गुरनुले, शेषराव तुळणकर, दिनेश निखाडे, केशव भोले, भाऊराव गाठे, प्रवीण महाजन, सचिन डोफे, तुकाराम थुटे, शंकर गुरनूले, चिंतामण राऊत, किसना शेंडे, हनुमंत राऊत, सुखदेव पाटील, विजय ठाकरे, पुंडलिक हुडे, अंकुश चेरे, सुनील हिवसे आदी उपस्थित होते.