शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पुनर्वसन; येणी दोडकावासीयांंचे ७ च्या आत घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 6:00 AM

बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची अनास्था कायम : बीटीआर-७ सह बीटीआर-९ वाघांमुळे येणी दोडका शिवारात दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील काही शेतशिवारात सध्या बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर आहे. त्यांच्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार केली जाते. शिवाय सदर वाघ मनुष्यावरही हल्ला करू पाहात असल्याने येणी दोडका परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. सदर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येणी दोडकावासीयांना ७ च्या आत घरात यावे लागत आहे. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात छोटे-मोठे असे एकूण सुमारे आठ वाघ असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यांना बीटीआर-१, बीटीआर-२ असे नावही देण्यात आली आहेत. कॅटरीना व अंबिका या दोन वाघिणींनी वेळोवेळी दिलेल्या बछड्यांमुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जमिनीत वाढ गरजेचे आहे. मुक्तसंचारासाठी जागा कमी पडत असल्याने अनेकदा बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ येणी दोडका शेत शिवारांपर्यंत येतात. अशातच ते वन्यप्राण्यांची शिकारही करतात. बहुतांशवेळा शेतात काम करणाºया मनुष्यावरही ते हल्ला चढवितात. त्यामुळे या भागातील नागरिकांना नेहमीच दहशतीत जीवन जगावे लागत आहे. इतकेच नव्हे, तर सध्या या परिसरात बीटीआर-७ आणि बीटीआर-९ या वाघांचा वावर असल्याने नागरिकही सायंकाळी काळोख पसरण्यापूर्वीच घर गाठतात. शिवाय रात्री घराबाहेर पडण्याचेही टाळतात. येणी दोडका हे गाव जंगलव्याप्त परिसरात असून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी वन्यप्राण्यांकडून केली जाते. नुकसानीपोटी वनविभागाकडून शासकीय मदत मिळत असली तरी ती झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तो अल्प राहत असल्याने शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. एखाद्यावेळी रात्रीच्या सुमारास गावातील कुणीची प्रकृती बिघडल्यास जीव धोक्यात टाकूनच रुग्णालय गाठावे लागते. नागरिकांची समस्या लक्षात घेता येणी दोडका या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आहे.आवश्यक वस्तूंकरिता ओलांडावी लागते गावाची सीमागावात साधे जीवनावश्यक साहित्याचे दुकान नाही. चक्की नाही त्यामुळे मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी गावकºयांना गावाची सीमा ओलांडावी लागते. काहींनी रोजगार आणि शिक्षणासाठी गावही सोडले. हिच अवस्था व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेलगत असलेल्या गरमसूर, मरकसूर, मेठहिरजी आणि उमराविहिरी या गावांची आहे.

टॅग्स :Tigerवाघ