शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या वेतनातून रकमेची कपात

By admin | Updated: June 6, 2014 00:08 IST

स्थानिक महाराणाप्रताप वॉर्डातील प्रकाश वानखेडे हे पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक या पदावर कार्यरत असताना अफरातफरी प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

न्यायालयाचा निर्देश धुडकावला : अफतरातफरप्रकरणआर्वी : स्थानिक महाराणाप्रताप वॉर्डातील प्रकाश वानखेडे हे पंचायत समिती अंतर्गत  ग्रामसेवक या पदावर कार्यरत असताना अफरातफरी प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट केले. आर्वीत व वर्धा न्यायालयाचा निकाल वानखेडे यांच्या बाजुने लागला. त्यांना निर्दोष ठरविण्यात आले.  तरीही अफरातफर प्रकरणात त्यांच्या सेवानवृत्ती प्रकरणातून १८ हजार १0७ रूपये कपात केले. यासाठी २00३ पासून जि. प. वर्धा कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे, मात्र अद्यापही त्यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला नसल्याची माहिती समोर आली.प्राप्त माहितीनुसार, आर्वी पं.स. अंतर्गत येत असलेल्या विरूळ ग्रामपंचायतीमध्ये प्रकाश वानखेडे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. एका अफरातफर प्रकरणात त्यांना निलंबित करून त्यांना पुन्हा सेवेते घेण्यात आले. याप्रकरणी आर्वी व वर्धा न्यायालय ८ ऑक्टोबर १९९८ च्या एका निकालात त्यांना सदर प्रकरणात निर्दोष ठरविण्यात आले. त्यावेळी त्यांनी न्यायालयीन निकालाच्याप्रती जि. प. वर्धा यांना सादर करुन शासनाकडे पुर्ववत कामावर घेण्याबाबत विनंती अर्ज करून न्याय मागितला. त्यावेळी शासनाने वानखेडे यांच्या सर्व कागदपत्रांची शाहनिशा करून ग्रामविकास  व जलसंधारण विभागाने त्यांना शासन आदेश क.डीईएन ३६९३ प्र.क्र. ६५, २३ मार्च २00१ आदेश पारीत करून पुन्हा सेवेत घेतले. आर्वी व वर्धा न्यायालयाने वानखेडे यांना निर्दोष ठरवूनही जि.प.ने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली. त्यानंतर ते सेवानवृत्त झाल्यानंतर त्यांच्यास सेवानवृत्तीच्या रक्कमेतून १८ हजारांची रक्कम कपात करण्यात आली. हा अन्याय दूर करण्यासाठी  गेल्या अकरा वर्षापासून जि. प. कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांशी प्रत्यक्ष भेट व पत्रव्यवहार करीत आहे. अनेकदा त्यांनी भेटी देऊन आपली व्यथा सांगितली. मात्र कोणीही ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाही. अद्याप न्याय मिळाली नसली तरी कार्यालयाचे उंबरठे झिजविणे मात्र थांबलेले नाही. माहितीच्या अधिकारात वानखेडे यांनी माहिती मागितली असता वानखेडे यांना तुम्हाला कोणत्या न्यायालयाने निर्दोष ठरविले याची माहिती मागितली. दि. २६ नोव्हेंबर १३ ला उपमुख्य कार्यपालन अधिकार्‍यांची  वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेट घेवून संपूर्ण आवश्यक कागदपत्रे तसेच आर्वी व वर्धा न्यायालयाच्या निकालाच्या प्रती दिल्या.  संबंधितांनी यावर त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर फेब्रुवारी १४ मध्ये संबंधितांची भेट घेवून प्रकरण मार्गी लावण्याची विनंती केली, परंतु काहीएक उपयोग झाला नाही. सेवेत असताना महत्त्व असते मात्र सेवानवृत्तीनंतर शासकीय कर्मचार्‍यालाच या बिकट परिस्थितीला सामारे जावे लागत असल्याचा प्रत्यय त्यांना आला.(तालुका प्रतिनिधी)