शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

बोर व्याघ्र प्रकल्पात ५९ पाणवठे सज्ज

By admin | Updated: February 20, 2017 01:12 IST

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात.

आठ पाणवठे नैसर्गिक : २१ ठिकाणी सोलर व्यवस्थारितेश वालदे सेलू (बोरधरण)बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात. यात प्राण्यांचा अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी वनविभागातर्फे नैसर्गिक, सोलर तसेच कृत्रिम, असे ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बोर तथा न्यू बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौरस किलोमीटर परिसरात व्यापलेला आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपूल जलसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची संख्या मोठया प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोर प्रकल्प आहे. सोबतच सोलर, कृत्रिम आणि नैसर्गिक, अशी ५९ पाणवठे या क्षेत्रात आहेत. यातील २१ पाणवठ्यांवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्याने दिवसभर सोलर पंपाद्वारे पाणवठ्यांत पाणी उपलब्ध होत आहे. आठ नैसर्गिक पाणवठ्यांत वर्षभर पाणी असते. इतर पाणवठ्यांवर टँकरद्वारे नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल क्षेत्रातच वन्य प्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील दुर्मीळ प्रजातीच्या वन्य प्राण्यांसोबत पशु व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध झाले आहे. यासाठी वनक्षेत्र अधिकारी आर.पी. गायनेर व जी.एफ. लुचे तसेच वनरक्षक, वनकर्मचारी प्रयत्नरत असतात. बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी भटकून ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. यामुळेच प्राण्यांचा अधिवासही वाढतीवरच असल्याचे दिसते.ग्रामस्थांचा उन्हाळ्यात प्राण्यांमुळे होणारा त्रास थांबणारजंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. जंगलातील प्राणी गावांमध्ये शिरून जनावरांसह प्रसंगी मानवावर हल्ले करतात. हे प्रकार टाळण्यासाठी जंगल क्षेत्रातच पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वन विभागाकडून ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात कधीही पाणी कमी होणार नाही, यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. परिणामी, प्राण्यांची भटकंती थांबून ग्रामस्थांचा त्रास दूर होणार असल्याचे सांगण्यात आले.