शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पात ५९ पाणवठे सज्ज

By admin | Updated: February 20, 2017 01:12 IST

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात.

आठ पाणवठे नैसर्गिक : २१ ठिकाणी सोलर व्यवस्थारितेश वालदे सेलू (बोरधरण)बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात. यात प्राण्यांचा अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी वनविभागातर्फे नैसर्गिक, सोलर तसेच कृत्रिम, असे ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बोर तथा न्यू बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौरस किलोमीटर परिसरात व्यापलेला आहे. राज्यातील जैविक विविधता आणि विपूल जलसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची संख्या मोठया प्रमाणात या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बोर प्रकल्प आहे. सोबतच सोलर, कृत्रिम आणि नैसर्गिक, अशी ५९ पाणवठे या क्षेत्रात आहेत. यातील २१ पाणवठ्यांवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्याने दिवसभर सोलर पंपाद्वारे पाणवठ्यांत पाणी उपलब्ध होत आहे. आठ नैसर्गिक पाणवठ्यांत वर्षभर पाणी असते. इतर पाणवठ्यांवर टँकरद्वारे नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल क्षेत्रातच वन्य प्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील दुर्मीळ प्रजातीच्या वन्य प्राण्यांसोबत पशु व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध झाले आहे. यासाठी वनक्षेत्र अधिकारी आर.पी. गायनेर व जी.एफ. लुचे तसेच वनरक्षक, वनकर्मचारी प्रयत्नरत असतात. बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी भटकून ग्रामस्थांना त्रास होऊ नये म्हणून वन विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. यामुळेच प्राण्यांचा अधिवासही वाढतीवरच असल्याचे दिसते.ग्रामस्थांचा उन्हाळ्यात प्राण्यांमुळे होणारा त्रास थांबणारजंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. जंगलातील प्राणी गावांमध्ये शिरून जनावरांसह प्रसंगी मानवावर हल्ले करतात. हे प्रकार टाळण्यासाठी जंगल क्षेत्रातच पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वन विभागाकडून ५९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात कधीही पाणी कमी होणार नाही, यासाठीही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. परिणामी, प्राण्यांची भटकंती थांबून ग्रामस्थांचा त्रास दूर होणार असल्याचे सांगण्यात आले.