शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवा सोशल फोरम आणि किसान अभियानच्या वतीने धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने कॉर्पोरेट आणि मोठ्या उद्योजकांना, धनदांडग्या व्यापाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि मित्रपक्षाचाही विश्वासघात करुन देशात भ्रामक वातावरण निर्माण करीत घाईघाईने ही तिनही विधेयके संसदेत केवण् आवाजी मताने मंजूर करुन घेतली. या तिन्ही कायद्यामध्ये कुठेही उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के अधिक हमीभाव देण्याचा उल्लेख केलेला नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

    लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीसंबंधीत तीन विधेयके संसदेत मंजूर करण्यात आली असून ही तिनही अधिनियमाच्या अनुषंगाने केलेल्या सुधारणा पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. या कायद्याच्या बदलाने देशातील सर्व सामान्य ९० टक्के एक हेक्टर पेक्षा कमी जमीन असेलेला शेतकरी आणि ४० टक्के शेती नसलेले शेतकरी असून या विधेयकांमुळे गरीब मजुरांच्या जिवनातील अडचणींत वाढ होणार आहे. त्यामुळे हे तिन्ही शेतकरी विरोधी विधेयकं मागे घेण्यासाठी किसान अधिकार अभियानच्या वतीने वर्धा ते नागपूर मार्गावर असलेल्या कान्हापूर जवळ रास्ता रोको करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवा सोशल फोरम आणि किसान अभियानच्या वतीने धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने कॉर्पोरेट आणि मोठ्या उद्योजकांना, धनदांडग्या व्यापाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि मित्रपक्षाचाही विश्वासघात करुन देशात भ्रामक वातावरण निर्माण करीत घाईघाईने ही तिनही विधेयके संसदेत केवण् आवाजी मताने मंजूर करुन घेतली. या तिन्ही कायद्यामध्ये कुठेही उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के अधिक हमीभाव देण्याचा उल्लेख केलेला नाही.या विधेयकात बाजार समित्या नष्ट करुन सरकारचे शेती उत्पादनाच्या खरेदी,विक्रीचे शेतकऱ्यांचे संरक्षण कवच काढून टाकणे, अन्नधान्य व आवश्यक शेती उत्पादनाची सरकारी खरेदी थांबविणे, अत्यावश्यक वस्तू कायद्यातील खाद्यतेल, बटाटे, कांदे,डाळी, अमर्याद साठ्यांचे निर्बंध काढून खासगीकरण करणे असे या विधेयकानुसार होणार आहे. हे शेतकरी विरोधी असून सरकारने शेतमालाला किफायतशीर हमीभाव आणि शेतकरी कर्जमुक्ती विधेयकांचा समावेश असलेली विधेयकही मंजूर करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यापेक्षा त्याचा कायद्यात सहभाग करावा,ग्रामीण कष्टकरी, शेतकरी, मजुरांच्या विरोधी पारीत केलवेली तिन्ही विधेयके रद्द करण्यात यावी, गैस सिलिंडर, डिझेल व पेट्राेलची झालेली दरवाढ मागे घ्यावी आदी विविध मागण्यांसाठी कान्हापूर परिसरात रस्तारोको करण्यात आला. यावेळी सागर महाकाळकर, जीवन बेले, मंगेश डोने, रामू भोयर यांच्यासह किसान अधिकारचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.धरणे आंदोलनात अविनाश काकडे, सुदाम पवार, सुधीर पांगुळ, नूतन माळवी, विठ्ठल झाडे, गोविंदा पेटकर, प्रफुल्ल कुकडे, गोपाल दुधाने, विजय वाघाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी