शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:40 PM

जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देमहिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.जिल्ह्यातील रापमच्या अनेक बसेसच्या खिडकींच्या काचा तुटलेल्या असून काही बसेस अर्ध्यातच दम टाकत असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर काही बसेसचे आसन फाटलेले आहेत. त्यामुळे नेहमीच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना योग्य प्रवासी सेवा देता यावी, यासाठी तत्कालीन विभाग नियंत्रक गव्हाळे यांच्या कार्यकाळात विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर रापमने सौजन्य नमस्कार उपक्रम राबविला. परंतु, तोही प्रवाशांना रापमच्या बसेसकडे आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा असर करू शकला नाही.जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात एकूण ३२० बसेस असून महिन्याकाठी या गाड्यांना ३६९ टायर लावल्या जातात. यापैकी २५९ टायर रिमोल्ड केलेले असतात. तर केवळ १२० नवीन टायरची खरेदी असल्याचे सांगण्यात आले.पाच आगारात एकूण ३२० बस गाड्याजिल्ह्यातील रापमच्या पाच आगारात ३२० बसेस असून त्या बसेस दररोज प्रवाशांना सेवा देण्यासाठी सोडण्याचे नियोजन केले जाते. परंतु, मोठ्या प्रमाणात रिमोल्ड टायरचा वापर होत असल्याने बहूदा या धावणाऱ्या रापमच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासातच पंक्चर होतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.वर्षाला ४,४२८ टायरची मागणीजिल्ह्यातील पाचही आगारातील एकूण ३२० बस गाड्यांसाठी प्रत्येक महिन्याला ३६९ तर वर्षाकाठी ४ हजार ४२८ टायरची मागणी राहते. परंतु, प्रत्येक वर्षी केवळ १ हजार ४४० नवीन टायरची खरेदी केली जात असल्याचे वास्तव आहे. नवीन टायरची खरेदी मागणीच्या तुलनेत नाममात्र होत असल्याने रिमोल्ड टायरचा वापर करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.आमच्या आगारात उत्कृष्ट बसेस आहेत. मागणीनुसार आम्ही चांगल्या ग्रेडच्या रिमोल्ड टायरचा बसच्या मागील चाकाकरिता वापर करतो. या विषयावर आमचा आगार विशेष लक्ष देते.- अतुल डाहाके, विभागीय भंडार अधिकारी, वर्धा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ