शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:40 IST

जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देमहिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.जिल्ह्यातील रापमच्या अनेक बसेसच्या खिडकींच्या काचा तुटलेल्या असून काही बसेस अर्ध्यातच दम टाकत असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर काही बसेसचे आसन फाटलेले आहेत. त्यामुळे नेहमीच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना योग्य प्रवासी सेवा देता यावी, यासाठी तत्कालीन विभाग नियंत्रक गव्हाळे यांच्या कार्यकाळात विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर रापमने सौजन्य नमस्कार उपक्रम राबविला. परंतु, तोही प्रवाशांना रापमच्या बसेसकडे आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा असर करू शकला नाही.जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात एकूण ३२० बसेस असून महिन्याकाठी या गाड्यांना ३६९ टायर लावल्या जातात. यापैकी २५९ टायर रिमोल्ड केलेले असतात. तर केवळ १२० नवीन टायरची खरेदी असल्याचे सांगण्यात आले.पाच आगारात एकूण ३२० बस गाड्याजिल्ह्यातील रापमच्या पाच आगारात ३२० बसेस असून त्या बसेस दररोज प्रवाशांना सेवा देण्यासाठी सोडण्याचे नियोजन केले जाते. परंतु, मोठ्या प्रमाणात रिमोल्ड टायरचा वापर होत असल्याने बहूदा या धावणाऱ्या रापमच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासातच पंक्चर होतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.वर्षाला ४,४२८ टायरची मागणीजिल्ह्यातील पाचही आगारातील एकूण ३२० बस गाड्यांसाठी प्रत्येक महिन्याला ३६९ तर वर्षाकाठी ४ हजार ४२८ टायरची मागणी राहते. परंतु, प्रत्येक वर्षी केवळ १ हजार ४४० नवीन टायरची खरेदी केली जात असल्याचे वास्तव आहे. नवीन टायरची खरेदी मागणीच्या तुलनेत नाममात्र होत असल्याने रिमोल्ड टायरचा वापर करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.आमच्या आगारात उत्कृष्ट बसेस आहेत. मागणीनुसार आम्ही चांगल्या ग्रेडच्या रिमोल्ड टायरचा बसच्या मागील चाकाकरिता वापर करतो. या विषयावर आमचा आगार विशेष लक्ष देते.- अतुल डाहाके, विभागीय भंडार अधिकारी, वर्धा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ