शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:40 IST

जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देमहिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर

गौरव देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.जिल्ह्यातील रापमच्या अनेक बसेसच्या खिडकींच्या काचा तुटलेल्या असून काही बसेस अर्ध्यातच दम टाकत असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर काही बसेसचे आसन फाटलेले आहेत. त्यामुळे नेहमीच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना योग्य प्रवासी सेवा देता यावी, यासाठी तत्कालीन विभाग नियंत्रक गव्हाळे यांच्या कार्यकाळात विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर रापमने सौजन्य नमस्कार उपक्रम राबविला. परंतु, तोही प्रवाशांना रापमच्या बसेसकडे आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा असर करू शकला नाही.जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात एकूण ३२० बसेस असून महिन्याकाठी या गाड्यांना ३६९ टायर लावल्या जातात. यापैकी २५९ टायर रिमोल्ड केलेले असतात. तर केवळ १२० नवीन टायरची खरेदी असल्याचे सांगण्यात आले.पाच आगारात एकूण ३२० बस गाड्याजिल्ह्यातील रापमच्या पाच आगारात ३२० बसेस असून त्या बसेस दररोज प्रवाशांना सेवा देण्यासाठी सोडण्याचे नियोजन केले जाते. परंतु, मोठ्या प्रमाणात रिमोल्ड टायरचा वापर होत असल्याने बहूदा या धावणाऱ्या रापमच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासातच पंक्चर होतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.वर्षाला ४,४२८ टायरची मागणीजिल्ह्यातील पाचही आगारातील एकूण ३२० बस गाड्यांसाठी प्रत्येक महिन्याला ३६९ तर वर्षाकाठी ४ हजार ४२८ टायरची मागणी राहते. परंतु, प्रत्येक वर्षी केवळ १ हजार ४४० नवीन टायरची खरेदी केली जात असल्याचे वास्तव आहे. नवीन टायरची खरेदी मागणीच्या तुलनेत नाममात्र होत असल्याने रिमोल्ड टायरचा वापर करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.आमच्या आगारात उत्कृष्ट बसेस आहेत. मागणीनुसार आम्ही चांगल्या ग्रेडच्या रिमोल्ड टायरचा बसच्या मागील चाकाकरिता वापर करतो. या विषयावर आमचा आगार विशेष लक्ष देते.- अतुल डाहाके, विभागीय भंडार अधिकारी, वर्धा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ