शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रोखरहित व्यवहाराकरिता रॅलीतून जनजागृती

By admin | Updated: January 19, 2017 00:34 IST

येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रभात किरण युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र वर्धा, ग्रामदूत सेवा केंद्र

भजनी मंडळाचा सहभाग : ‘गाव कॅशलेस’ करण्याचा निर्धार अल्लीपूर : येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रभात किरण युवा मंडळ, नेहरू युवा केंद्र वर्धा, ग्रामदूत सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गावात रोखरहीत व्यवहाराविषयी जागृती करण्यात आली. गावातील नागरिकांनी दवाखाना, हॉटेल, चहा कॅन्टींग, मेडिकलचे दुकान, व्यापारी प्रतिष्ठान येथे रोखरहीत व्यवहार करावा, असा संदेश देण्यात आला. रोखरहीत व्यवहाराबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलेल्या आवाहनानुसार गावात डेबिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहे. जिल्हाधिकारी नवाल यांनी गावाला भेट देऊन याविषयी माहिती घेतली आहे. गावातील सर्व व्यवहार रोखरहीत करण्याकरिता संस्थेमार्फत ग्रामस्थांत जागृती करण्यात आली. इंदिरा गांधी विद्यालय व यशवंत विद्यालयाचे विद्यार्थी, भजन मंडळी यांच्या सहभागाने गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. यावेळी सरपंच मंदा पारसडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी अशोक गव्हाळे, माझी सरपंच गजू नरड, ग्रा.पं. सदस्य इस्त्राईल पठाण, रूपाली साखरकर, प्रेमिला बेले, कुसूम मानमोडे, बंडू बगवे, तलाठी सुबोध धोंगडी, प्रभात किरण युवा मंडळाचे अध्यक्ष सतीश काळे, कैलास घोडे, नंदकिशोर साळवे, उमेश ढगे, सचिन पारसडे, तुलसीराम वाघमारे, प्रा. हेमंत पारसडे, आशा सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)