शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

राजू बकाने भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

By admin | Updated: January 16, 2016 02:28 IST

भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून देवळी येथील भाजपचे युवा नेते राजू बकाने यांची अविरोध निवड झाली. त्यांच्या रुपाने देवळी तालुक्याला पक्षाचे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.

अविरोध निवड : भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घोषणावर्धा : भाजपाचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून देवळी येथील भाजपचे युवा नेते राजू बकाने यांची अविरोध निवड झाली. त्यांच्या रुपाने देवळी तालुक्याला पक्षाचे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.वर्धा नागरी बँकेच्या माधव सभागृहात शुक्रवारी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून राजू बकाने यांचे नाव सुचित केले. खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर आणि आ. समीर कुणावार यांच्यासह सर्व माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. यानंतर दुसरे कोणतेही नाव पुढे न आल्याने आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष सुभाष पारधी यांनी राजू बकाने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत घोषणा केली. व्यासपीठावर प्रामुख्याने भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, खा. रामदास तडस, मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समंीर कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे व विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे ही मंडळी विराजमान होती.मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे यांचे मनोगत झाले. याप्रसंगी नवे जिल्हाध्यक्ष बकाने यांच्याहस्ते डॉ. गोडे यांचा सत्कार करण्यात आला. बकाने यांनी सूत्रे हाती घेताच आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करण्याचा शब्द उपस्थित पदाधिकारी व सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांना दिला. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांची भाषणे झाली. प्रत्येकांनी भाजप सरकारच्या काळातील योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा सूर काढला. बैठकीचे संचालन श्रीधर देशमुख, तर आभार सुनील गफाट यांनी मानले.राजू बकाने हे देवळीचे रहिवासी असून मागील दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. २००१ मध्ये भाजप-सेना युतीकडून नगराध्यक्ष पदाची सार्वत्रिक निवडणूक लढली होती. मात्र त्यांना यात अपयश आले. यानंतर २००६ मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे नगरसेवकपदाची निवडणूक लढली आणि ती जिंकली. २०११ मध्ये त्यांनी रासदास तडस यांच्या नेतृत्वात भाजपात पुन:प्रवेश करीत नगरसेवक पदाची निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढली आणि ती जिंकली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढण्याची मनीषा ते बाळगून होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी माजी खासदार सुरेश वाघमारे यांना तिकीट दिल्यामुळे त्यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले. यामुळे देवळीत भाजपात बंडखोरी होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यांना शांत बसविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. भाजपची राज्य व केंद्रात सत्ता असल्यामुळे त्यांची एखाद्या महामंडळावर वर्णी लागेल, अशाही वावळ्या उठल्या होत्या. अशातच त्यांची आज जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याने साऱ्या चर्चांना या निमित्ताने पूर्णविराम लागला आहे, असा सूरही यावेळी ऐकायला मिळाला.(जिल्हा प्रतिनिधी)भाजप नेत्यांचा अधिकारी वर्गांबाबत नाराजीचा सूरकेंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता अद्यापही काँग्रेस सरकारच्या काळातीलच आहे. त्यांना भाजपचे सरकार नको आहे, अशी त्यांची मानसिकता बघायला मिळते. भाजपच्या कार्यकर्त्यांची कामे हे अधिकारी करत नाही. सरकार बदलले तर अधिकारीही बदलले पाहिजे, अशा शब्दात बैठकीत भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर आसूड ओढले. यावर उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या.भाजपची सत्ता आल्यानंतर तीन वरिष्ठ अधिकारी बदलले हे विशेषकेंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर वर्धा जिल्ह्यात काँग्रेसच्या काळात असलेले जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि जि.प. मुख्याधिकारी उदय चौधरी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या हे विशेष.