शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी संकुलाऐवजी ज्ञानकेंद्र उभारा

By admin | Updated: January 8, 2015 23:00 IST

नगरपालिकेच्या जुना दवाखाना परिसरात व्यापारी संकुल बांधकामाचा निर्णय पालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. या बांधकामाला शहरातील नागरिकांकडून विरोध होत असून त्या जागी ज्ञान केंद्र

हिंगणघाट : नगरपालिकेच्या जुना दवाखाना परिसरात व्यापारी संकुल बांधकामाचा निर्णय पालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. या बांधकामाला शहरातील नागरिकांकडून विरोध होत असून त्या जागी ज्ञान केंद्र आणि सामाजिक व धार्मिक केंद्र किंवा शहराचे सौंदर्य वाढविण्याकरिता एखादे उद्यान निर्माण करावे, यासाठी स्थानिकांनी आमदारांना साकडे घातले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या मागील बाजूस असलेल्या जागेत ज्ञान केंद्र उभारण्याचा संकल्प समता सैनिक दलाचा असल्याचे म्हटले आहे. या केंद्रामध्ये एक सामाजिक व धार्मिक केंद्र सुद्धा निर्माण करून त्यामध्ये सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा दलाचा प्रस्ताव आहे. सोबतच या जागेत संस्कार केंद्र उभारून तरुणांचे लक्ष विधायक कामाकडे वळविण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.वस्तुत: यापूर्वीच नगरपालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागात व्यवसायिक संकुल उभारलेली आहेत. यात चिमटेबाबा ग्राऊंड येथील व्यापारी संकुलातील दुकाने, गोलबाजार येथील संकुलाचा समावेश आहे. शहरात इतक्या प्रमाणात नगरपालिकेने व्यापारी संकुल उभारलेले आहेत. याशिवाय शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुस व प्रमुख मार्गावर असलेली खाजगी दुकाने तसेच श्रीराम टॉकीज सारखे खासगी गाळे तयार होत आहेत. शहरातील एकाही नागरिकाने अशा संकुलाची नगरपालिकेकडे मागणी केलेली नसताना नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोई-सुविधाकडे दुर्लक्ष करून सदर व्यापार संकुल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिंगणघाट शहरातील नागरिकांची व्यापारी संकुल असावे अशी कुठलीही मागणी नाही. वस्तुत: शहराला नव्या व्यापारी संकुलाची आवश्यकता नाही. यापूर्वी नगरपालिकेने वेगवेगळ्या परिसरात व्यापारी संकुल बांधलेली आहेत. येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा संदर्भ लक्षात घेता येथे ज्ञान केंद्र आणि सामाजिक व धार्मिक केंद्र उभारण्यात यावे. सोबतच त्या ज्ञान केंद्रसमोर डॉ. आंबेडकर पार्क निर्माण करण्यात यावे. संबंधित बाबींचा विचार करून सदर प्रकल्पाच्या बांधकामास स्थगिती द्यावी आणि सदर भुखंडाचे आरक्षण करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास करावी अशी मागणी नागरिकांकडून आ. समीर कुणावार यांना केली आहे.(तालुका प्रतिनिधी)