शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

श्रावणसरींनी दिला वर्धेकरांना दिलासा; २३७.७९ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 21:33 IST

Wardha News मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे जलाशयातील पाणी पातळीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : तब्बल बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्री उशिरापासून जोर धरला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. (Rain gave relief to Wardha; 237.79 mm of rainfall)

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर अर्धा पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने वर्धेकरांवर जलसंकटाचे सावट होते. अशातच श्रावणसरी जिल्ह्यात दमदार बरसल्याने वर्धेकरांना दिलासा मिळाला आहे. पण जिल्ह्यातील सर्वच जलाशये अजूनही १०० टक्के भरली नसल्याने दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ५१.८६ मिमी, सेलू तालुक्यात १५.५५ मिमी, देवळी तालुक्यात ४६.८० मिमी, हिंगणघाट तालुक्यात २१.१५ मिमी, समुद्रपूर तालुक्यात १७.०० मिमी, आर्वी तालुक्यात २८.९७ मिमी, आष्टी तालुक्यात ३१.६० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात २५.०५ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

उभ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी

पावसाने दडी मारल्याने तसेच ऊन तापत असल्याने कोरडवाहू शेतजमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक माना टाकत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. परंतु, रविवारी रात्रीपासून थांबून थांबून झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे.

जलाशयांत ७६.६४ टक्के जलसाठा

जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण अकरा जलाशये आहेत. रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे या जलाशयातील पाणी पातळीत नाममात्र का हाेईना पण वाढ झाली आहे. सध्या या अकरा जलाशयांत ७६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस