शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

श्रावणसरींनी दिला वर्धेकरांना दिलासा; २३७.७९ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 21:33 IST

Wardha News मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे जलाशयातील पाणी पातळीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : तब्बल बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्री उशिरापासून जोर धरला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. (Rain gave relief to Wardha; 237.79 mm of rainfall)

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर अर्धा पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने वर्धेकरांवर जलसंकटाचे सावट होते. अशातच श्रावणसरी जिल्ह्यात दमदार बरसल्याने वर्धेकरांना दिलासा मिळाला आहे. पण जिल्ह्यातील सर्वच जलाशये अजूनही १०० टक्के भरली नसल्याने दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ५१.८६ मिमी, सेलू तालुक्यात १५.५५ मिमी, देवळी तालुक्यात ४६.८० मिमी, हिंगणघाट तालुक्यात २१.१५ मिमी, समुद्रपूर तालुक्यात १७.०० मिमी, आर्वी तालुक्यात २८.९७ मिमी, आष्टी तालुक्यात ३१.६० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात २५.०५ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

उभ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी

पावसाने दडी मारल्याने तसेच ऊन तापत असल्याने कोरडवाहू शेतजमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक माना टाकत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. परंतु, रविवारी रात्रीपासून थांबून थांबून झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे.

जलाशयांत ७६.६४ टक्के जलसाठा

जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण अकरा जलाशये आहेत. रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे या जलाशयातील पाणी पातळीत नाममात्र का हाेईना पण वाढ झाली आहे. सध्या या अकरा जलाशयांत ७६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस