शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वर्धा नदीच्या खोऱ्यात परत धडधडणार रेल्वे

By admin | Updated: February 5, 2017 00:33 IST

झुक-झुक झुक-झुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. आजही हे गाणे जेव्हाही कानावर पडते

कास्तकारांना हक्काची बाजारपेठ मिळणार : पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्ग सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी वर्धा : झुक-झुक झुक-झुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. आजही हे गाणे जेव्हाही कानावर पडते तेव्हा डोळ्यासमोर येते ती झुक-झुक आवाज काढणारी हर फिक्र को धुएं से उडाता चला गया.. याच अविर्भावात सुरेल शिट्टी वाजवत आपल्या लटक्या चालीत कोळशावर धावणारी शकुंतला. ही शकुंतला वर्धा नदीच्या खोऱ्यात परत धडधडणार हे ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नव्याने शकुंतला रेल्वे रुळाचे सर्वेक्षण हाती घेण्याचे बजेटमध्ये घोषित केले आहे. यावेळी हा नवा रेल्वे मार्ग पुलगाव-आर्वी-वरुडपर्यंत असणार आहे. वर्धा नदीच्या खोऱ्यातून धावणारी ही रेल्वे वरुड मार्गे थेट काश्मीरपर्यंत कनेक्ट होणार आहे. संपूर्ण उत्तर भारतातून मुंबई बंदराकडे निर्यात होणारा माल आणि मुंबई बंदरातून उत्तर भारतकडे आयात होणारा माल याच मार्गावरुन नेता येईल. वर्धा नदीच्या कास्तकारांना परत एकदा हक्काची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आर्वी-पुलगाव नॅरोगेज ब्रॉडगेज परीतर्वनाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. दि. ०६ आॅगस्ट २०१४ रोजी शून्य प्रहारातून तसेच दि. १० आॅगस्ट २०१६ रोजी नियम ३७७ अंतर्गत प्रत्यक्षपणे लोकसभेत या बहुप्रलंबित मागणीवर खा. रामदास तडस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रभावीरित्या मांडली गेली. भारत सरकारच्या व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमातून ‘पुंजीनिवेश कार्यक्रम २०१७-१८’ या योजनेतून शकुंतला रेल्वे, आर्वी-पुलगाव, मूर्तीजापूर-यवतमाळ, मूर्तीजापूर-अचलपूर या रेल्वे मार्गांना ब्रॉडगेज परिवर्तनाकरिता मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आत्महत्याग्रस्त वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या बाजार पेठेकडे जाण्याकरिता मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वेच्या आवागमनामुळे परिसरामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या रेल्वे मार्गाचे परिवर्तन ब्रॉडगेजमध्ये होत असल्याने अनेक प्रवाश्यांना थेट आर्वी तालुक्याशी कुठल्याही प्रकारची गाडी न बदलता भविष्यात प्रवास करता येणार आहे.(जिल्हा प्रतिनिधी) पुलगाव-आर्वी-वरूड या रेल्वेमार्गाच्या मंजुरीचा विषय होता किचकट ८५-८६ च्या काळात शकुंतलाला अखेरचे बॉयलरमध्ये पाणी भरताना पाहिले असेल. ३५ वर्षे लोकांना सेवा देत शकुंतला धापा टाकत धावत होती. एकदिवस अचानक कोळश्याचे इंजिन बंद पडले काही दिवसांनी डिझेलचे इंजिन आले. नव्या इंजिनवर शकुंतला १०-१५ वर्षे धावली. बेढब इंजिन असलेली ही नवी रेल्वे नावापूर्तीच शकुंतला होती. एकेदिवशी शकुंतलेचा ब्रिटिशांबरोबर असलेला करार संपुष्टात आला. रेल्वे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शकुंतला पुलगाव स्टेशनच्या यार्डात उभी राहू लागली. आर्वीला उरले फक्त ओसाड स्टेशन आणि गंजलेल्या रुळांचे सांगाडे. शकुंतलाने आणलेली समृध्दी जाताना ती घेऊन गेली. तिच्या भरोश्यावर पाटीलकी गाजवणाऱ्या कास्तकारांच्या हातात दोरखंडाचा फास देऊन. ३५ वषे झालेल लोअर वर्धा धरणाचे काम सुरू होऊन आता कुठे पाणी अडवण्यापूरते काम झाले, पण शेतकऱ्यांचे शेत कोरडेच आहेत. ३५ वर्षात ३५ एकरचा शेतकरी ५ एकरवर आला आहे. पुलगाव-आर्वी-वरूड या लाईनच्या मंजुरीच्या किचकट व कठिण प्रवासात दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळल्याचे बोलले जात आहे.. आर्वी परिसरातील ज्या सर्व तरूणांनी शकुंतला रेल्वेसाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांना व प्रयत्नांना आता यश आले आहे.