शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अफवेच्या बाजारात ग्राहकांची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:56 PM

पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली.

ठळक मुद्देम्हणे, ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल बंदी : भीतीपोटी बोअरवेल करण्यासाठी नागरिकांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाअभावी जलाशयांनी तळ गाठल्याने भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याच भीतीने नागरिकांनी बोअरवेलकडे धाव घेतली; अशातच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची वावडी उठविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी वाढीव दर चुकवत बोअरवेल करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. सध्या या अफवेमुळे ग्राहकांची चांगलीच लूट सुरुअसून ही अफवा कुणी पसरविली व का? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.जिल्ह्यातील पाणीबाणी तीव्र होतांना दिसून येत असल्याचा फायदा आता काही मंडळी घेताना दिसून येत आहे. सध्या जलाशयात केवळ २७ टक्केच जलसाठा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागातही तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. डिसेंबर महिन्यातच ही अवस्था असताना भविष्यात नागरिकांना आठ ते पंधरा दिवसानंतर पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच नागरिकांनी बोअरवेल करण्याचा पर्याय निवडला आहे. बोअरवेलला मागणी वाढत असताना पाहून ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी हातचे काम सोडून मशीन मिळविण्यासाठी बोअरवेल व्यावसायीक व एजंटकडे धाव घेतली आहे.सध्या तर बोअरवेलचे भावही वीस ते तीस रुपयाने वाढविण्यात आले आहे. नागरिकांची गरज लक्षात घेत अफवेचा दाखला देऊन आणखी जास्त पैसे कसे उकळता येईल, याचाच प्रयत्न काहींकडून सुरु आहे. परंतु संबधित विभागाकडे बोअरवेल करण्याच्या बंदीबाबत विचारणा केली असता कोणताही आदेश नसल्याचे सांगण्यात आल्याने ही केवळ अफवाच असल्याने उघडकीस आले आहे.एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असताना त्यांना मानुसकीच्या नात्याने सहकार्य करण्याऐवजी दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलून आपले खिसे भरण्याचा लाजिरवाणा प्रकार काहींनी चालविल्याने दिसून येत आहे. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन ही लुटमार थांबवित यावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरतांना दिसून येत आहे.बोअरवेल व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची लूटशहरात सध्या बोअरवेल दर वाढले आहे. कमी दरात दुसरा बोरवेल व्यावसायिक बोरवेल करायला तयार असल्यास वर्ध्यातील बोअरवेल व्यवसायिक असोसिएशन त्याला वर्ध्यात काम करु देत नाही.अशा प्रकारे शहरातील नागरिक व शेतकऱ्यांची बोअरवेल व्यावसायिकांनी लुट चालविली आहे. असा आरोप किसान सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू हिंगमोरे यांनी केला आहे. डिझलचे भाव कायम असतानाही बोअरवेलचे दर वाढविण्यात आल्याने यावर लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी येणार असल्याबाबत कुठलाही आदेश किंवा पत्र आमच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. तसे असते तर कार्यालयाकडून संबंधितांना आधीच सूचना दिल्या असत्या, असे भूजल सर्वेक्षण अधिकारी भुसारी यांनी सांगितले.वर्ध्यात आठ व्यवसायिक आहेत. एका दिवशी दोन बोरवेल केले जात आहे. सध्या डिझलचे भाव वाढल्याने आणि कामागांची मजूरी वाढल्याने बोरवेलचे दर वाढवावे लागले, असे बोअरवेल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल जावंधिया यांनी सांगितले.बोरवेलनंतर आता जलपुनर्भरणाची गरजजगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून गरजेनुसार सर्वच नागरिक भूगर्भ पोखरायला लागले आहे. पाचशे मीटरच्या परिसरात दुसरे बोअरवेल करता येणार नाही, असे नियम असतानाही याला छेद दिला जात आहे. तसेच दीडशेपेक्षाही जास्त फुट खोलपर्यंत बोअरवेल केली जात आहे. यामुळे भविष्यात भूगर्भातील पाणीही नाहिसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन प्रत्येकाने घरी व कार्यालयात जलपुनर्भरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई