लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे सर्वच लॉकडाऊन... त्यातच हाताला काम नाही... भुकेची आग झोपू देत नाही... खिशातही नाममात्र पैसे अशाच परिस्थितीत हतबल झालेल्या १४ मजुरांनी हैद्राबाद येथून पायदळ मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जाण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. तब्बल सुमारे ४५० किमीचा प्रवास पूर्ण करून वर्धा गाठलेले हे मजूर गस्तीवर असलेल्या वर्धा शहर पोलिसांच्या चमूला दिसल्यानंतर त्यांना विचारपूस करण्यात आली. त्यानंतर त्यांचा गैरसमज दूर करून त्यांची आरोग्य तपासणी करीत सदर मजुरांना मदनमोहन धर्मशाळेत ठेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहर पोलिसांनी महिला आश्रम परिसरातून २५ ते ३० वयोगटातील १४ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केल्यानंतर ते मुळचे मध्यप्रदेशातील छिंडवाडा येथील असल्याचे आणि रोजगारानिमित्त ते मागील काही दिवसांपासून हैद्राबाद येथे वास्तव्याला होते अशी माहिती पुढे आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर हातावर पोट असलेल्या या मजूरांचा रोजगारच हिरावल्याचे आणि दळणवळणाची साधने बंद असल्याने ते त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी हैद्राबाद येथून पायदळच निघाल्याची माहिती या मजुरांनी पोलिसांना दिली. हे १४ मजूर १ एप्रिलला हैद्राबाद येथून निघाले.तब्बल ४५० किमीचा प्रवास पूर्ण केला. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरातून पुढील प्रवास करीत असताना ते मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश पारधी, मांढरे, सतीश दुधाने, रमेश वाघ, महेंद्र अढाव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मदनमोहन धर्मशाळेत ठेवल्याचे सांगण्यात आले.मुख्य मार्गाने प्रवास टाळायचेहैद्राबाद येथून निघालेले हे १४ मजूर मुख्य मार्गाने प्रवास करण्याचे टाळत वर्धेपर्यंत पोहोचले. पण वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरात ते गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना मदनमोहन धर्मशाळा या निवारागृहात ठेवण्यात आले आहे.हैद्राबाद येथून छिंदवाडा (मध्यप्रदेश)कडे जाणाºया १४ मजुरांना ताब्यात घेत आरोग्य तपासणी करून त्यांना मदनमोहन या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. सुमारे ४५० किमीचा पायदळ प्रवास पूर्ण करून वर्ध्यात पोहोचलेले हे मजूर मुख्य मार्गांनी प्रवास करण्याचे टाळत होते. त्यांच्या जेवणासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.- योगेश पारधी, ठाणेदार, शहर पोलीस ठाणे, वर्धा.
हैद्राबादवरून मध्यप्रदेशात जाणारे मजूर वर्ध्यात ‘क्वारंटाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST
तब्बल ४५० किमीचा प्रवास पूर्ण केला. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरातून पुढील प्रवास करीत असताना ते मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश पारधी, मांढरे, सतीश दुधाने, रमेश वाघ, महेंद्र अढाव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मदनमोहन धर्मशाळेत ठेवल्याचे सांगण्यात आले.
हैद्राबादवरून मध्यप्रदेशात जाणारे मजूर वर्ध्यात ‘क्वारंटाईन’
ठळक मुद्देपाच दिवसांत पायदळ पूर्ण केला ४५० किलोमीटरचा प्रवास