शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

‘यशवंती’ला दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:50 IST

दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.

ठळक मुद्देभंगार बसेसचा भरणा : विद्यार्थ्यांना करावी लागली पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. मंगळवारला चिकणी-पडेगाव दरम्यान बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांनाच बसला धक्का देण्याची वेळ आली.पडेगाव या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळ आहे. वर्धा-देवळी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावात बससेवा सुरळीत नव्हती. सदर गाव मुख्य मार्गावर नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांना ३ कि़मी. अंतर चालत येऊन चिकणी येथून बस घ्यावी लागत. शंभराहुन अधिक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. तसेच देवळी ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांना खरेदीकरिता येथेच यावे लागते. वारंवार मागणी केल्यावर दोन वर्षापूर्वी वर्धा ते राळेगाव यशवंती बस सुरू करण्यात आली. मात्र ही बससेवा विद्यार्थी व्व व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे वारंवार दिसून आले.ही बस अनेकदा उशिराने येते तर कधी येतच नाही. कधी तर रस्त्यातच नादुरूस्त होते. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची ताटकळ होते. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी व प्रवाशांना सहन करावा लागतो. असाच प्रकार मंगळवार दि. २ जानेवारीला घडला. दुपारी १२ वाजता येणारी राळेगाव-वर्धा यशवंती बस चिकणी-पडेगाव मार्गावर नादुरूस्त होवून बंद पडली. भुकेने व्याकुळ झालेले विद्यार्थी बराच वेळ बसकरिता ताटकळत होते. अखेर ही बस सुरू न झाल्याने दुसरी बस बोलविल्यावर प्रवाशांची सुटका झाली.भंगार बसेस न सोडण्याची ग्रामस्थांची विनंतीबस बंद पडल्यावर चालकाच्या विनंतीवरून प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसला धक्का दिला. मात्र बस सुरू करण्याचा हा प्रयत्न असफल ठरला. वर्धा विभागाला माहिती दिल्यावर दुसरी बस बोलविण्यात आली. तर नादुरूस्त बसला दोरी बांधून वर्धा येथे नेण्यात आले. प्रवासी व विद्यार्थ्यांना मात्र गावापर्यंत पायपीट करावी लागली. गावात भंगार बसेस सोडू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ