शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंती’ला दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:50 IST

दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.

ठळक मुद्देभंगार बसेसचा भरणा : विद्यार्थ्यांना करावी लागली पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. मंगळवारला चिकणी-पडेगाव दरम्यान बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांनाच बसला धक्का देण्याची वेळ आली.पडेगाव या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळ आहे. वर्धा-देवळी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावात बससेवा सुरळीत नव्हती. सदर गाव मुख्य मार्गावर नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांना ३ कि़मी. अंतर चालत येऊन चिकणी येथून बस घ्यावी लागत. शंभराहुन अधिक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. तसेच देवळी ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांना खरेदीकरिता येथेच यावे लागते. वारंवार मागणी केल्यावर दोन वर्षापूर्वी वर्धा ते राळेगाव यशवंती बस सुरू करण्यात आली. मात्र ही बससेवा विद्यार्थी व्व व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे वारंवार दिसून आले.ही बस अनेकदा उशिराने येते तर कधी येतच नाही. कधी तर रस्त्यातच नादुरूस्त होते. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची ताटकळ होते. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी व प्रवाशांना सहन करावा लागतो. असाच प्रकार मंगळवार दि. २ जानेवारीला घडला. दुपारी १२ वाजता येणारी राळेगाव-वर्धा यशवंती बस चिकणी-पडेगाव मार्गावर नादुरूस्त होवून बंद पडली. भुकेने व्याकुळ झालेले विद्यार्थी बराच वेळ बसकरिता ताटकळत होते. अखेर ही बस सुरू न झाल्याने दुसरी बस बोलविल्यावर प्रवाशांची सुटका झाली.भंगार बसेस न सोडण्याची ग्रामस्थांची विनंतीबस बंद पडल्यावर चालकाच्या विनंतीवरून प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसला धक्का दिला. मात्र बस सुरू करण्याचा हा प्रयत्न असफल ठरला. वर्धा विभागाला माहिती दिल्यावर दुसरी बस बोलविण्यात आली. तर नादुरूस्त बसला दोरी बांधून वर्धा येथे नेण्यात आले. प्रवासी व विद्यार्थ्यांना मात्र गावापर्यंत पायपीट करावी लागली. गावात भंगार बसेस सोडू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ