शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

‘यशवंती’ला दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:50 IST

दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.

ठळक मुद्देभंगार बसेसचा भरणा : विद्यार्थ्यांना करावी लागली पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. मंगळवारला चिकणी-पडेगाव दरम्यान बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांनाच बसला धक्का देण्याची वेळ आली.पडेगाव या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळ आहे. वर्धा-देवळी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावात बससेवा सुरळीत नव्हती. सदर गाव मुख्य मार्गावर नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाश्यांना ३ कि़मी. अंतर चालत येऊन चिकणी येथून बस घ्यावी लागत. शंभराहुन अधिक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. तसेच देवळी ही परिसरातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांना खरेदीकरिता येथेच यावे लागते. वारंवार मागणी केल्यावर दोन वर्षापूर्वी वर्धा ते राळेगाव यशवंती बस सुरू करण्यात आली. मात्र ही बससेवा विद्यार्थी व्व व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे वारंवार दिसून आले.ही बस अनेकदा उशिराने येते तर कधी येतच नाही. कधी तर रस्त्यातच नादुरूस्त होते. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची ताटकळ होते. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थी व प्रवाशांना सहन करावा लागतो. असाच प्रकार मंगळवार दि. २ जानेवारीला घडला. दुपारी १२ वाजता येणारी राळेगाव-वर्धा यशवंती बस चिकणी-पडेगाव मार्गावर नादुरूस्त होवून बंद पडली. भुकेने व्याकुळ झालेले विद्यार्थी बराच वेळ बसकरिता ताटकळत होते. अखेर ही बस सुरू न झाल्याने दुसरी बस बोलविल्यावर प्रवाशांची सुटका झाली.भंगार बसेस न सोडण्याची ग्रामस्थांची विनंतीबस बंद पडल्यावर चालकाच्या विनंतीवरून प्रवासी व विद्यार्थ्यांनी बसला धक्का दिला. मात्र बस सुरू करण्याचा हा प्रयत्न असफल ठरला. वर्धा विभागाला माहिती दिल्यावर दुसरी बस बोलविण्यात आली. तर नादुरूस्त बसला दोरी बांधून वर्धा येथे नेण्यात आले. प्रवासी व विद्यार्थ्यांना मात्र गावापर्यंत पायपीट करावी लागली. गावात भंगार बसेस सोडू नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ