शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. ७० रुपयांच्या सोयाबीन तेलाची ११० रु. भावाने खरेदी! वर्धेतील दिव्यांग प्रशिक्षण संस्थेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 10:47 IST

राज्यात एकमेव असलेल्या वर्धेतील दिव्यांगांच्या प्रशिक्षण संस्थेत सोयाबीनचे तेल ११० रुपये किलो दराने खरेदी झाले आहे.

ठळक मुद्देराज्यातील एकमेव संस्था

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : राज्यात एकमेव असलेल्या वर्धेतील दिव्यांगांच्या प्रशिक्षण संस्थेत सोयाबीनचे तेल ११० रुपये किलो दराने खरेदी झाले आहे. बाजारात आतापर्यंत कधीच ११० रुपये किलोने सोयाबीन तेल विकल्या गेले नाही. यातही होणारी खरेदी ठोक दरात असल्याने हे दर कमी असणे अपेक्षित असताना, येथे हा प्रकार घडला आहे.दिव्यांगांना औद्योगिक शिक्षण देऊन सक्षम बनविण्याकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून ही अपंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. वर्धेतील ही संस्था राज्यात एकमेव असून विविध समस्यांनी तिला ग्रासले आहे. असे असताना ही संस्था समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदीचा बळी ठरत असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.संस्थेत केवळ आठ विद्यार्थी असून त्यांच्यावर महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. हा खर्च विद्यार्थ्यांवर होत असला तर वावगे नाही, पण यातून अधिकाऱ्यांचेच चांगभले होत असेल तर शासनाच्या उद्देशाला येथे हरताळ फासल्या जात असल्याचे दिसते.किराणा खरेदी वर्धेतून नाही तर नागपुरातून ठोक स्वरूपात झाली आहे. यामुळे किराण्याचे दर कमी असणे अपेक्षित असताना यादीत असलेले दर अनेकांच्या भुवया उंवाविण्यास पुरेसे आहेत. लावलेले दर आणि वजनाचा विचार केल्यास हा किराणा खरच विद्यार्थ्यांकरिता खरेदी केला की अन्य कोणत्या कारणाकरिता हे समजणे विचाराच्या पलिकडचे आहे. आठ विद्यार्थ्यांकरिता १५ किलो शेंगदाणे हे गणित कसे हे कोणालाही कळणार नाही. केवळ किराणाच नाही इतर साहित्याच्या खरेदीतही संशय निर्माण होत आहे.

स्वीपर खराटा ६० रुपयेघरी पाणी काढण्याकरिता आणि झाडझूड करण्याकरिता असलेला स्वीपर खराटा २० रुपयांत मिळतो. बाजारात ही किंमत असताना येथे या खराट्याची किंमत एक नग ६० रुपये एवढी लावण्यात आली आहे. एवढेच नाही तर इतर साहित्याच्या दराबाबतही संशय निर्माण होत आहे.

आठ विद्यार्थ्यांकरिता २२ हजारांचा किराणासंस्थेत अधीक्षक आणि अधिकाºयांच्या संगनमताने भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार समोर येत आहेत. आठ विद्यार्थ्यांकरिता तब्बल २१ हजार ८६६ रुपयांचा किराणा आणला आहे. यातून विद्यार्थ्यांना नेमके काय दिले, हा संशोधनाचा विषय आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ठरवून देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून किराणा घेण्यात येत आहे. यात कुठलीही गडबड झालेली नाही. होत असलेला खर्च आणि झालेली खरेदी नियमात आहे. केंद्रातील विद्यार्थ्यांची संख्या कमीअधिक होत असते. यामुळे खर्च कमी-जास्त होतो.- पी.आर. नागोडे, अधीक्षक, अपंग प्रशिक्षण संस्था, वर्धा.

टॅग्स :Crimeगुन्हा