शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी बाजारात सर्वाधिक तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:39 IST

सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली.

ठळक मुद्देअडीच हजार शेतकऱ्यांना मुदतवाढीच्या पत्राची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सध्या राज्यातील शासकीय तूर खरेदी बंद झाली आहे. ती सुरू होण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे. याच काळात आर्वी बाजार समितीत आतापर्यंत १८ हजार ७६४ क्विंटल तूर खरेदी केली. येथे आॅनलाईन नोंद झालेल्यापैकी १,७४५ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी झाली आहे. यात अजून २,५११ शेतकरी तूर घेवून रांगेत आहेत. यामुळे अनेकांच्या नजरा मुदतवाढीच्या पत्राकडे लागल्या आहेत.यावर्षी आर्वी बाजारात शासकीय खरेदी केंद्रावर तालुका खरेदी विक्री संघाकडे ४,२५६ शेतकºयांनी तूर खरेदीची आॅनलाईन नोंदणी केली. यात आर्वी बाजार समितीने वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७६४ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. यात १,७४५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात अजून २,५११ शेतकऱ्यांना २५ हजार क्विंटल तूर येण्याची अपेक्षा आहे. आर्वी बाजार समितीत चणा खरेदीसाठी ६५९ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. यात ११८ शेतकऱ्यांचा १९५६ क्विंटल चणा खरेदी करण्यात आला आहे. यात चणा खरेदीसाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.आर्वी बाजार समितीत गत दोन दिवसात चण्याची विक्रमी आवक झाल्याने सध्या बाजार समितीची चणा खरेदी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. यात बाजार समित्यांचे गोदाम फुल झाल्याने नवीन माल ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने तातडीने माल खरेदीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.नवा खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना अजूनही तूर खरेदीची अपेक्षा आहे. यात शासनाने मुदतवाढ दिल्याने उर्वरित शेतकऱ्यांची तूर शासनाने तातडीने खरेदी करावी, जेणेकरुन तुरीच्या हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरात पडेल.राज्यात दोन लाख शेतकऱ्यांची नोंदणीगोदामाचे कारण काढून शासनाच्या पणन महामंडळाच्यावतीने तूर खरेदी बंद करण्यात आली. यामुळे आॅनलाईन नोंदी करून असलेल्या शेतकऱ्यांना ही मुदत वाढण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात आजच्या घडीला सुमारे दोन लाख शेतकरी नोंदणी करून आहेत. त्यांच्याकडून मुदतवाढीची मागणी आहे.आर्वी बाजार समितीने यावर्षी शेतकऱ्याची विक्रमी तूर खरेदी केली आहे. अजूनही बरेच शेतकऱ्याची तूर खरेदी व्हायची आहे. उर्वरीत तूर शासनाने तातडीने खरेदीकरुन हमीभावाचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. तूर खरेदीबाबत मुदत वाढीचे पत्र अद्याप बाजार समितीला प्राप्त झाले नाही.- विनोद कोटेवार, प्रभारी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती,आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरी