शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

दिल्लीच्या कृषी भवनातून कृषिमंत्र्यांच्या यादीतून पंजाबराव देशमुखांचे नाव गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 10:33 IST

याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांकडे करणार विचारणावैदर्भीयांमध्ये संताप

अभिनय खोपडे

वर्धा : दिल्ली येथील कृषी भवनात लावलेल्या कृषिमंत्री तालिकेवरून भारताचे पहिले कृषिमंत्री राहिलेले डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब झाल्याचा संतापजनक प्रकार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिल्ली भेटीत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वैदर्भीय नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९५२ मध्ये देशात अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. अशा परिस्थितीत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना नेहरू यांनी कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यांनी ती समर्थपणे बजावली. भाऊसाहेबांच्या काळात शेती क्षेत्रात व्यापक बदल करण्यात आले. चांगले बियाणे, वीज, पाणी आदींच्या दृष्टीने शेती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वैदर्भीय भूमिपुत्राची देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून झालेली निवड ही अतिशय अभिमानाची बाब होती. असे असताना दिल्ली येथील कृषी भवनात देशाच्या कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळनिहाय लावलेल्या नामतालिकेतून (फलक) डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा संतापजनक प्रकार असून यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे विचारणा करण्याचा निर्धार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे.

असा झाला उलगडा

अमरावती जिल्ह्यातील काही मान्यवर हे दिल्ली येथे एका समाज संमेलनासाठी गेले होते. त्यांनी कृषी भवनाला भेट दिली. यावेळी कृषी भवनात देशाच्या ३२ कृषिमंत्र्यांची नावे व छायाचित्र झळकताना दिसले. कृषिमंत्र्यांच्या या तालिकेत १९४६ पासून ते आजतागायत सर्व कृषिमंत्र्यांची नावे दिसली. मात्र १९५२ मध्ये कृषिमंत्रीपद भूषविलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव दिसले नाही. त्यांनी या प्रकाराबाबत तेथे विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

कृषी भवनात फलकावर पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते कृषिमंत्र्यांना विचारणा करणार आहेत.

- रजनीकांत भाई.

टॅग्स :Socialसामाजिकagricultureशेती