शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दिल्लीच्या कृषी भवनातून कृषिमंत्र्यांच्या यादीतून पंजाबराव देशमुखांचे नाव गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 10:33 IST

याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांकडे करणार विचारणावैदर्भीयांमध्ये संताप

अभिनय खोपडे

वर्धा : दिल्ली येथील कृषी भवनात लावलेल्या कृषिमंत्री तालिकेवरून भारताचे पहिले कृषिमंत्री राहिलेले डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब झाल्याचा संतापजनक प्रकार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिल्ली भेटीत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वैदर्भीय नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९५२ मध्ये देशात अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. अशा परिस्थितीत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना नेहरू यांनी कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यांनी ती समर्थपणे बजावली. भाऊसाहेबांच्या काळात शेती क्षेत्रात व्यापक बदल करण्यात आले. चांगले बियाणे, वीज, पाणी आदींच्या दृष्टीने शेती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वैदर्भीय भूमिपुत्राची देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून झालेली निवड ही अतिशय अभिमानाची बाब होती. असे असताना दिल्ली येथील कृषी भवनात देशाच्या कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळनिहाय लावलेल्या नामतालिकेतून (फलक) डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा संतापजनक प्रकार असून यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे विचारणा करण्याचा निर्धार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे.

असा झाला उलगडा

अमरावती जिल्ह्यातील काही मान्यवर हे दिल्ली येथे एका समाज संमेलनासाठी गेले होते. त्यांनी कृषी भवनाला भेट दिली. यावेळी कृषी भवनात देशाच्या ३२ कृषिमंत्र्यांची नावे व छायाचित्र झळकताना दिसले. कृषिमंत्र्यांच्या या तालिकेत १९४६ पासून ते आजतागायत सर्व कृषिमंत्र्यांची नावे दिसली. मात्र १९५२ मध्ये कृषिमंत्रीपद भूषविलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव दिसले नाही. त्यांनी या प्रकाराबाबत तेथे विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

कृषी भवनात फलकावर पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते कृषिमंत्र्यांना विचारणा करणार आहेत.

- रजनीकांत भाई.

टॅग्स :Socialसामाजिकagricultureशेती