शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दिल्लीच्या कृषी भवनातून कृषिमंत्र्यांच्या यादीतून पंजाबराव देशमुखांचे नाव गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 10:33 IST

याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांकडे करणार विचारणावैदर्भीयांमध्ये संताप

अभिनय खोपडे

वर्धा : दिल्ली येथील कृषी भवनात लावलेल्या कृषिमंत्री तालिकेवरून भारताचे पहिले कृषिमंत्री राहिलेले डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब झाल्याचा संतापजनक प्रकार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिल्ली भेटीत उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वैदर्भीय नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेशचंद्र तोमर यांना विचारणा केली जाणार असल्याची माहिती शेतकरी बचाव आंदोलनाचे संयोजक रजनीकांत भाई यांनी ‘लोकमत‘ला दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना १९५२ मध्ये देशात अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. अशा परिस्थितीत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना नेहरू यांनी कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यांनी ती समर्थपणे बजावली. भाऊसाहेबांच्या काळात शेती क्षेत्रात व्यापक बदल करण्यात आले. चांगले बियाणे, वीज, पाणी आदींच्या दृष्टीने शेती स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वैदर्भीय भूमिपुत्राची देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून झालेली निवड ही अतिशय अभिमानाची बाब होती. असे असताना दिल्ली येथील कृषी भवनात देशाच्या कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळनिहाय लावलेल्या नामतालिकेतून (फलक) डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा संतापजनक प्रकार असून यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे विचारणा करण्याचा निर्धार वैदर्भीय सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केला आहे.

असा झाला उलगडा

अमरावती जिल्ह्यातील काही मान्यवर हे दिल्ली येथे एका समाज संमेलनासाठी गेले होते. त्यांनी कृषी भवनाला भेट दिली. यावेळी कृषी भवनात देशाच्या ३२ कृषिमंत्र्यांची नावे व छायाचित्र झळकताना दिसले. कृषिमंत्र्यांच्या या तालिकेत १९४६ पासून ते आजतागायत सर्व कृषिमंत्र्यांची नावे दिसली. मात्र १९५२ मध्ये कृषिमंत्रीपद भूषविलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव दिसले नाही. त्यांनी या प्रकाराबाबत तेथे विचारणा केली. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

कृषी भवनात फलकावर पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे नाव गायब असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते कृषिमंत्र्यांना विचारणा करणार आहेत.

- रजनीकांत भाई.

टॅग्स :Socialसामाजिकagricultureशेती