शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

साथीच्या आजाराने पुलगावकर झाले बेजार

By admin | Updated: August 17, 2016 00:44 IST

श्रावणधारा बरसत असून उन्ह पावसाच्या खेळामुळे वातावरणात बदल झाला आहे.

ग्रामीण रुग्णालयांत गर्दी : दररोज २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांत पुलगाव : श्रावणधारा बरसत असून उन्ह पावसाच्या खेळामुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी गॅस्ट्रो, डायरियासह कीटकजन्य व जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सोबतच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी व संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी पुलगावकर बेजार झाले आहे. तालुक्यातील पुलगाव शहरासह देवळी, भिडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. देवळी, गौळ, नाचणगाव, गिरोली, विजयगोपाल या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या २५० ते ३०० वर गेली आहे. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनाही सुगीचे दिवस आले आहे. देवळी तालुक्यात चांगला पाऊस बरसल्याने बळीराजा आनंदला आहे. परंतु कधी कडक उन्ह तर कधी ढगाळ वातावरण यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहे. गत पंधरा दिवसांपासून व्हायरल फिवरची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालये ४ ते ५.३० पर्यंत असली तरी सकाळपासून दुपारपर्यंत आरोग्य केंद्रात रुग्णांच्या रांगा लागलेल्या असतात. आय.पी.एच.एस. दर्जाच्या तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. तशी तरतूदही असल्याचे समजते. तरीही नाचणगाव सारख्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी २० गावातील ३३ हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहे. डॉक्टराच्या रिक्त पदांच्या अनुशेषामुळे इतर आरोग्य केंद्रातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात अतिसार, सर्दी, अंगदुखी आदी आजारांच्या औषधींची तुटवडा असल्याचे समजते. काही ठिकाणी सिकलसेल तपासणीच्या सोल्युबिलिटी किट्स तसेच रक्तगट तपासणीच्या किट्स उपलब्ध नसल्याने रुग्ण या सेवेपासून वंचित राहत आहेत. यामुळे शासनाची चिट्ठीमुक्त योजना कमकुवत ठरत असून औषधी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागात रुग्णाच्या आरोग्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)