शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

साथीच्या आजाराने पुलगावकर झाले बेजार

By admin | Updated: August 17, 2016 00:44 IST

श्रावणधारा बरसत असून उन्ह पावसाच्या खेळामुळे वातावरणात बदल झाला आहे.

ग्रामीण रुग्णालयांत गर्दी : दररोज २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांत पुलगाव : श्रावणधारा बरसत असून उन्ह पावसाच्या खेळामुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी गॅस्ट्रो, डायरियासह कीटकजन्य व जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सोबतच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी व संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. परिणामी पुलगावकर बेजार झाले आहे. तालुक्यातील पुलगाव शहरासह देवळी, भिडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. देवळी, गौळ, नाचणगाव, गिरोली, विजयगोपाल या पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या २५० ते ३०० वर गेली आहे. शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांनाही सुगीचे दिवस आले आहे. देवळी तालुक्यात चांगला पाऊस बरसल्याने बळीराजा आनंदला आहे. परंतु कधी कडक उन्ह तर कधी ढगाळ वातावरण यामुळे वातावरणातील उकाडा वाढला आहे. गत पंधरा दिवसांपासून व्हायरल फिवरची साथ पसरली आहे. शासकीय रुग्णालये ४ ते ५.३० पर्यंत असली तरी सकाळपासून दुपारपर्यंत आरोग्य केंद्रात रुग्णांच्या रांगा लागलेल्या असतात. आय.पी.एच.एस. दर्जाच्या तसेच जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. तशी तरतूदही असल्याचे समजते. तरीही नाचणगाव सारख्या मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी २० गावातील ३३ हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहे. डॉक्टराच्या रिक्त पदांच्या अनुशेषामुळे इतर आरोग्य केंद्रातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील काही आरोग्य केंद्रात अतिसार, सर्दी, अंगदुखी आदी आजारांच्या औषधींची तुटवडा असल्याचे समजते. काही ठिकाणी सिकलसेल तपासणीच्या सोल्युबिलिटी किट्स तसेच रक्तगट तपासणीच्या किट्स उपलब्ध नसल्याने रुग्ण या सेवेपासून वंचित राहत आहेत. यामुळे शासनाची चिट्ठीमुक्त योजना कमकुवत ठरत असून औषधी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागत आहे. ग्रामीण भागात रुग्णाच्या आरोग्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)