शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:48 IST

शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या काही विहिरी जमीनदोस्त : काहींचा कचरा टाकण्यासाठी होतोय वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी, कोट्यवधी रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पुलगाव बॅरेज आदी सर्व कार्यान्वित असल्या तरीही नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर वर्धा निम्न वर्धा धरणामुळे वर्धा नदीला पाणी नाही. अशा परिस्थितीत शहरात असणाºया जुन्या मोठ्या विहिरी भर उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान भागवित होत्या. परंतु, मागील काही वर्षांत शहरातील काही मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या, तर काही विहिरींचा उपयोग शहरवासीयांनी केरकचरा टाकण्यासाठी केला.साधारणत: मे, जून महिन्यात शहरात पाणी समस्या निर्माण होत असे. त्यावर उपाय म्हणून नगर प्रशासनाने शहरातील हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, बरांडा येथील मोठ्या विहिरींवर मोटारपंप बसवून शहरात टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करीत असे, परंतु मागील काही वर्षात दयालनगर, आठवडी बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगतच्या विहिरी जमीनदोस्त केल्या. तर हरिरामनगर व गणेशनगर येथील विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.रखरखते उन्ह व धरणातील पाण्याची पातळी पाहता वर्धा माई कोरडी झाली आहे. परिणामी पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरत नसल्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरात असणाºया हापंपवर पहाटेपासून आई-बहिणी गर्दी करीत आहेत. खासगी विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे.पाणी समस्या सुटावी म्हणून वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज बांधण्यात येत आहे. हे काम मे २०१० मध्ये सुरू झाले असून अद्याप पूर्ण झाले नाही. उलट ९५ कोटी खर्चाचे बांधकाम ३०० कोटींवर पोहोचले तरी शहरवासी भर उन्हातही तहानलेलेच आहे. दोन वेळ पाणीपुरवठ्याचे बील घेणाºया नगर प्रशासनाचे शहरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई