शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:48 IST

शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या काही विहिरी जमीनदोस्त : काहींचा कचरा टाकण्यासाठी होतोय वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी, कोट्यवधी रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पुलगाव बॅरेज आदी सर्व कार्यान्वित असल्या तरीही नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर वर्धा निम्न वर्धा धरणामुळे वर्धा नदीला पाणी नाही. अशा परिस्थितीत शहरात असणाºया जुन्या मोठ्या विहिरी भर उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान भागवित होत्या. परंतु, मागील काही वर्षांत शहरातील काही मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या, तर काही विहिरींचा उपयोग शहरवासीयांनी केरकचरा टाकण्यासाठी केला.साधारणत: मे, जून महिन्यात शहरात पाणी समस्या निर्माण होत असे. त्यावर उपाय म्हणून नगर प्रशासनाने शहरातील हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, बरांडा येथील मोठ्या विहिरींवर मोटारपंप बसवून शहरात टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करीत असे, परंतु मागील काही वर्षात दयालनगर, आठवडी बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगतच्या विहिरी जमीनदोस्त केल्या. तर हरिरामनगर व गणेशनगर येथील विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.रखरखते उन्ह व धरणातील पाण्याची पातळी पाहता वर्धा माई कोरडी झाली आहे. परिणामी पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरत नसल्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरात असणाºया हापंपवर पहाटेपासून आई-बहिणी गर्दी करीत आहेत. खासगी विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे.पाणी समस्या सुटावी म्हणून वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज बांधण्यात येत आहे. हे काम मे २०१० मध्ये सुरू झाले असून अद्याप पूर्ण झाले नाही. उलट ९५ कोटी खर्चाचे बांधकाम ३०० कोटींवर पोहोचले तरी शहरवासी भर उन्हातही तहानलेलेच आहे. दोन वेळ पाणीपुरवठ्याचे बील घेणाºया नगर प्रशासनाचे शहरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई