शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

चार दिवसांपासून पुलगावकरांना पाणीपुरवठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:48 IST

शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा करणाऱ्या काही विहिरी जमीनदोस्त : काहींचा कचरा टाकण्यासाठी होतोय वापर

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील कोट्यवधीची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यामुळे काही दिवसांपासून शहरवासीयांना दूषित पाणीपुरवठा होता होेता. मागील चार दिवसापासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच नाही. पुढे दोन-तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा सभापती गौरव दांडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शहरालगत बारमाही वाहणारी वर्धा नदी, कोट्यवधी रूपये खर्चाची पाणीपुरवठा योजना पुलगाव बॅरेज आदी सर्व कार्यान्वित असल्या तरीही नदीवर बांधण्यात आलेल्या अप्पर वर्धा निम्न वर्धा धरणामुळे वर्धा नदीला पाणी नाही. अशा परिस्थितीत शहरात असणाºया जुन्या मोठ्या विहिरी भर उन्हाळ्यात शहरवासीयांची तहान भागवित होत्या. परंतु, मागील काही वर्षांत शहरातील काही मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या, तर काही विहिरींचा उपयोग शहरवासीयांनी केरकचरा टाकण्यासाठी केला.साधारणत: मे, जून महिन्यात शहरात पाणी समस्या निर्माण होत असे. त्यावर उपाय म्हणून नगर प्रशासनाने शहरातील हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, बरांडा येथील मोठ्या विहिरींवर मोटारपंप बसवून शहरात टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करीत असे, परंतु मागील काही वर्षात दयालनगर, आठवडी बाजार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगतच्या विहिरी जमीनदोस्त केल्या. तर हरिरामनगर व गणेशनगर येथील विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.रखरखते उन्ह व धरणातील पाण्याची पातळी पाहता वर्धा माई कोरडी झाली आहे. परिणामी पाणीपुरवठा करणारा जलकुंभ भरत नसल्यामुळे मागील चार दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे शहरात असणाºया हापंपवर पहाटेपासून आई-बहिणी गर्दी करीत आहेत. खासगी विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी मिळणे कठीण झाले आहे.पाणी समस्या सुटावी म्हणून वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज बांधण्यात येत आहे. हे काम मे २०१० मध्ये सुरू झाले असून अद्याप पूर्ण झाले नाही. उलट ९५ कोटी खर्चाचे बांधकाम ३०० कोटींवर पोहोचले तरी शहरवासी भर उन्हातही तहानलेलेच आहे. दोन वेळ पाणीपुरवठ्याचे बील घेणाºया नगर प्रशासनाचे शहरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई