शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पुलगाव बॅरेज @ ३०० कोटी

By admin | Updated: January 7, 2015 22:57 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत

शासकीय उदासीनता : २०११ ही डेडलाईन असताना काम रखडलेलेचप्रभाकर शहाकार - पुलगावआशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर मे २००९ रोजी बॅरेजच्या कामाचा शुभारंभ झाला़ २०११ पर्यंत बॅरेजचे काम पूर्ण व्हावे, हे अपेक्षित होते; पण आता २०१४ उलटले तरी बॅरेजला मूर्त रूप आले नाही़ काम पूर्ण होणे तर दूरच बॅरेजचे कामही रखडले आहे. ८५ कोटींच्या या बॅरेजची किमत आता ३०० कोटींवर पोहोचली आहे.जवळपास ५० हजार लोकसंख्येचे शहर व परिसरातील १३ गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मिल, रेल्वे स्टेशन आदींच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा या दृष्टीने बरेचदा प्रयत्न झालेत़ वर्धा नदीवर कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्याचा प्रस्तावही शासन दरबारी रेटण्यात आला होता; पण राजकीय खेळीमुळे हा प्रश्न रेंगाळत राहिला़ यामुळे शहर व परिसरातील जनतेची भर उन्हात पाण्यासाठी पायपीट होत राहिली़़ १९८० मध्ये ठरलेली ही योजना राजकीय उदासीनतेपोटी १९९१-९२ मध्ये ७५ लाखांवर पोहोचली़ यानंतर कित्येक वर्षे कोल्हापूरी बंधाऱ्याचे घोडे पेंड खातच राहीले. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन यावर कायम उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कोल्हापूरी बंधाऱ्याचा प्रश्न मागे पडला़ यानंतर वर्धा नदीवर ८५ कोटी रुपयांच्या पुलगाव बॅरेज व ९४ कोटींच्या खर्डा बॅरेजची योजना कार्यान्वित करण्यात आली़ मे २००९ मध्ये पुलगाव बॅरेजच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले़ हे काम २०११ पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; पण २०१४ नंतरही या कामाला फारशी गती मिळाल्याचे दिसून येत नाही़ जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांची कामे केल्यानंतरही संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचा मोबदला देण्यात आलेला नाही़ यामुळे हे बांधकाम रखडलेले आहे़ आता कोल्हापूरी बंधाऱ्याप्रमाणेच बॅरेजची स्थिती होणार नाही ना, अशी शंका नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे़सध्या या बॅरेजची किंमत प्रचंड वाढली आहे़ ८५ कोटींचा बॅरेज ३०० कोटी रुपयांवर पोहोचला असून आता निधी उपलब्ध होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे़ यामुळे पुलगाव व परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुबत्ता येणार, हे स्वप्न दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत आहे़