शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव बॅरेज @ ३०० कोटी

By admin | Updated: January 7, 2015 22:57 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत

शासकीय उदासीनता : २०११ ही डेडलाईन असताना काम रखडलेलेचप्रभाकर शहाकार - पुलगावआशिया खंडातील सर्वात मोठा केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मील आणि परिसरातील १३ गावे, हा परिसर पुलगावला जोडला आहे़ या सर्वांना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहरालगत पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर मे २००९ रोजी बॅरेजच्या कामाचा शुभारंभ झाला़ २०११ पर्यंत बॅरेजचे काम पूर्ण व्हावे, हे अपेक्षित होते; पण आता २०१४ उलटले तरी बॅरेजला मूर्त रूप आले नाही़ काम पूर्ण होणे तर दूरच बॅरेजचे कामही रखडले आहे. ८५ कोटींच्या या बॅरेजची किमत आता ३०० कोटींवर पोहोचली आहे.जवळपास ५० हजार लोकसंख्येचे शहर व परिसरातील १३ गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या केंद्रीय दारूगोळा भांडार, कॉटन मिल, रेल्वे स्टेशन आदींच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा या दृष्टीने बरेचदा प्रयत्न झालेत़ वर्धा नदीवर कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्याचा प्रस्तावही शासन दरबारी रेटण्यात आला होता; पण राजकीय खेळीमुळे हा प्रश्न रेंगाळत राहिला़ यामुळे शहर व परिसरातील जनतेची भर उन्हात पाण्यासाठी पायपीट होत राहिली़़ १९८० मध्ये ठरलेली ही योजना राजकीय उदासीनतेपोटी १९९१-९२ मध्ये ७५ लाखांवर पोहोचली़ यानंतर कित्येक वर्षे कोल्हापूरी बंधाऱ्याचे घोडे पेंड खातच राहीले. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन यावर कायम उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कोल्हापूरी बंधाऱ्याचा प्रश्न मागे पडला़ यानंतर वर्धा नदीवर ८५ कोटी रुपयांच्या पुलगाव बॅरेज व ९४ कोटींच्या खर्डा बॅरेजची योजना कार्यान्वित करण्यात आली़ मे २००९ मध्ये पुलगाव बॅरेजच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले़ हे काम २०११ पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; पण २०१४ नंतरही या कामाला फारशी गती मिळाल्याचे दिसून येत नाही़ जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांची कामे केल्यानंतरही संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचा मोबदला देण्यात आलेला नाही़ यामुळे हे बांधकाम रखडलेले आहे़ आता कोल्हापूरी बंधाऱ्याप्रमाणेच बॅरेजची स्थिती होणार नाही ना, अशी शंका नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे़सध्या या बॅरेजची किंमत प्रचंड वाढली आहे़ ८५ कोटींचा बॅरेज ३०० कोटी रुपयांवर पोहोचला असून आता निधी उपलब्ध होणार की नाही, हे सांगणेही कठीणच आहे़ यामुळे पुलगाव व परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुबत्ता येणार, हे स्वप्न दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत आहे़