शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

वर्धा शहर स्वच्छतेसाठी २५ टक्के निधीची तरतूद

By admin | Updated: March 1, 2017 00:50 IST

येथील नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी पार पडली.

नव्या चमूचा पहिला अर्थसंकल्प : पालिकेचे ७८.४४ कोटींचे नियोजन वर्धा : येथील नगर परिषदेची विशेष अर्थसंकल्पीय सभा पालिकेच्या सभागृहात मंगळवारी पार पडली. यात ७८ कोटी ४४ लाख ६९ हजार ३०७ रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात २५ टक्के रक्कम स्वच्छता अभियानाकरिता राखीव असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षाअखेर सर्व उत्पन्न व खर्च वजा जाता ३९ लाख ३४ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. पालिकेत सत्तांतरण झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने याकडे वर्धेकरांचे विशेष लक्ष लागले होते. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सादर केला. यावेळी उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, सर्वच विषय समित्यांचे सभापती तथा सर्वच सदस्यांची उपस्थिती होती. या संकल्पाला सभागृहात उपस्थित सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भारत स्वच्छता व अभियानाकरिता एकूण बजेटच्या २५ टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. यात एकूण महसूली उत्पन्न ४२ कोटी ९२ लाख २० हजार रुपये दर्शविण्यात आले आहे. तर भांडवली उत्पन्न २० कोटी ३० लाख ७० हजार रुपये दर्शविले आहे. या दोन्ही प्रस्तावित उत्पन्नातून यंदाचा खर्च करण्यात येणार आहे. यात महसुली खर्च ३८ कोटी १९ लाख ८५ हजार तर भांडवली खर्च २९ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये दर्शविण्यात आला आहे. या खर्चानंतर ३९ लाख ३४ हजार ३०७ रुपये शिल्लक राहणार असल्याचे अर्थसंकल्प दर्शवित आहे. पालिकेच्या सर्वप्रकारच्या अस्थापना खर्चावर २३ कोटी ४७ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च आहे. कार्यालयीन खर्चावर १ कोटी ८२ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र कचरा पसरला आहे. या घनकचरा व्यवस्थापनाकरिता ५ कोटी, नाला सफाई २५ लाख, कचरा उचलने ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पाणी पुरवठ्याकरिता ५० लाख, पाईपलाईन देखभाल दुरूस्तीकरिता ३० लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. दिवाबत्तीकरिता २५ लाख तर पथदिव्यांच्या देयकापोटी १ कोटी रुपये प्रस्तावित आहे. प्राथमिक शाळा दुरूस्तीकरिता एकूण अर्थसंकल्पातील १ टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. शिक्षण विभागाकरिता ७० लक्ष रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे.(प्रतिनिधी)