शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे.

ठळक मुद्देशेतकरीबांधवांची मागणी : सर्वेक्षणाचा फार्स नको, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे ढीग भिजलेत

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खरिपातील सोयाबीन पिकाला सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. खरे पाहता सर्वेक्षण करण्याचीही गरज नाही. सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक प्रभावित झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा हप्ता भरला आहे, त्यांना कंपनीकरवी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी सोयाबीन उत्पादकांची मागणी आहे.अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे. तर ज्यांनी सवंगणी केली नाही, त्या झाडांवरील शेंगांना अंकुर फुटत आहे.अनेकांनी कापणी न करता शेतात जनावरे सोडली. अनेक शेतकरी उघाड पडल्याबरोबर शेतात रोटावेटर फिरवून सोयाबीनची उभी झाडे जमिनीत गाडण्याच्या विचारात आहेत. एकंदरीत सर्वेक्षण करून नुकसानीचा अंदाज घेण्याची काहीच गरज नाही. सर्वच शेतातील सोयाबीनची अवस्था पेरले एक पोते, झाले अर्धा पोते तर खर्च एकरी १० ते १५ हजार. उत्पन्न मात्र शून्य रूपये अशी आहे. म्हणून पीक विमा कंपन्यांनी ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन सोयाबीन उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच पीक विमा वाढण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी कंपन्यांची वकिली करणाऱ्या महसूल विभाग, कृषी विभाग व बँकांच्या प्रशासनाने याकामी शेतकऱ्यांचे वकीलपत्र स्वीकारत पुढाकार घेऊन भरपाई देण्यास कंपनी प्रशासनाला बाध्य करावे, अशी भावना जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. नैसर्गिकचार एकरात सोयाबीन पेरले. सर्व काळजी घेऊन पीक तयार केले. पीकही चांगले आले. पावसाने थोडी उसंत देताच प्रतिएकर दोन हजार रुपये मजुरीने सवंगणी केली. शेतातील लहान-लहान ढीग उचलण्याआधीच सतत पाऊस येत असल्याने शेतांतील ढीग पूर्ण सडले असून पीक खराब झाले आहे.- प्रशांत गलाट, शेतकरी, दिघी (हिवरा).

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा