शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 05:00 IST

अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे.

ठळक मुद्देशेतकरीबांधवांची मागणी : सर्वेक्षणाचा फार्स नको, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे ढीग भिजलेत

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : खरिपातील सोयाबीन पिकाला सततचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. खरे पाहता सर्वेक्षण करण्याचीही गरज नाही. सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक प्रभावित झाले आहे. अशावेळी विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा हप्ता भरला आहे, त्यांना कंपनीकरवी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी सोयाबीन उत्पादकांची मागणी आहे.अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सततच्या पावसामुळे काहींनी कापणी करून ढीग लावले. त्यांचे ढीग ओलाव्याने खराब होत आहे. ज्यांना ढीग करणे शक्य झाले नाही, त्याचे सोयाबीन शेतात ओले होत आहे. तर ज्यांनी सवंगणी केली नाही, त्या झाडांवरील शेंगांना अंकुर फुटत आहे.अनेकांनी कापणी न करता शेतात जनावरे सोडली. अनेक शेतकरी उघाड पडल्याबरोबर शेतात रोटावेटर फिरवून सोयाबीनची उभी झाडे जमिनीत गाडण्याच्या विचारात आहेत. एकंदरीत सर्वेक्षण करून नुकसानीचा अंदाज घेण्याची काहीच गरज नाही. सर्वच शेतातील सोयाबीनची अवस्था पेरले एक पोते, झाले अर्धा पोते तर खर्च एकरी १० ते १५ हजार. उत्पन्न मात्र शून्य रूपये अशी आहे. म्हणून पीक विमा कंपन्यांनी ही नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन सोयाबीन उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच पीक विमा वाढण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी कंपन्यांची वकिली करणाऱ्या महसूल विभाग, कृषी विभाग व बँकांच्या प्रशासनाने याकामी शेतकऱ्यांचे वकीलपत्र स्वीकारत पुढाकार घेऊन भरपाई देण्यास कंपनी प्रशासनाला बाध्य करावे, अशी भावना जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. नैसर्गिकचार एकरात सोयाबीन पेरले. सर्व काळजी घेऊन पीक तयार केले. पीकही चांगले आले. पावसाने थोडी उसंत देताच प्रतिएकर दोन हजार रुपये मजुरीने सवंगणी केली. शेतातील लहान-लहान ढीग उचलण्याआधीच सतत पाऊस येत असल्याने शेतांतील ढीग पूर्ण सडले असून पीक खराब झाले आहे.- प्रशांत गलाट, शेतकरी, दिघी (हिवरा).

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा