शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ढोल-ताशांच्या गजरात रंगतोय प्रचाराचा फड

By admin | Updated: November 18, 2016 02:17 IST

नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे. मतदानाचा दिनांक दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने

मनधरणीला वेग : आश्वासनांच्या पावसात नाहतोय मतदारप्रशांत हेलोंडे वर्धानगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे. मतदानाचा दिनांक दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. सध्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शहरातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. या रॅल्यांमध्ये ढोल- ताशांचा गजर होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि अपक्षांकडूनही रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या या फैरींमुळे शहरातील वातावरण ढवळून निघत आहे. वर्धा नगर परिषदेच्या नराध्यक्ष पदाकरिता १४ उमेदवार रिंगणात दंड थोपटून आहेत. यात राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भाजपकडून अतुल तराळे, काँगे्रसकडून प्रवीण हिवरे, राष्ट्रवादी काँगे्रसचे चंद्रशेखर खडसे, शिवसेनेचे राजेश सराफ, आम आदमी पार्टीचे रवींद्र साहू, बहुजन समाज पार्टीचे गणेश जवादे, रिपाइंचे अशोक मेश्राम यांच्यासह अपक्ष सुधीर पांगुळ, नरेंद्र गुजर, मोहन चौधरी, सुरेश ठाकरे, तुषार देवढे, आशिष पुरोहित, सुरेश रंगारी हे सर्वच उमेदवार प्रचाराची शिकस्त करीत आहेत. यात राजकीय पक्षांसह अपक्षांच्या प्रचाराचे फडही चांगलेच गाजत आहेत. प्रचाराच्या विविध पद्धती उमेदवारांकडून शोधून काढण्यात आल्या आहेत. सर्वाधिक प्रचार वाहने, सायकल रिक्षांवर भोंगे वाजवून केला जात आहे. यात देशभक्तीपर गीतांसह सिनेमाच्या गीतांचे बोल कानी पडत आहेत. मतदारांना हा मोठ्या आवाजातील प्रचार ‘बोअर’ होऊ नये म्हणून विविध गीतांचा वापर केला जात आहे. यात शिवसेनेचे ‘सैराट’वर आधारीत गाणे, तर आप उमेदवाराची वेगळी शैली आणि काँग्रेसचे एलईडी असलेले वाहन मतदारांचे लक्ष वेधत आहे. काहींनी उमेदवारांवरच गीत बसविले आहे. सिनेमाच्या गीतांच्या चालीवर उमेदवारांची गाणी मतदारांच्या कानी पडत आहेत. ही प्रचार शैली बहुतांश उमेदवारांनी आत्मसात केली असून काहींनी यातून आपली मते मांडण्याचा प्रयत्नही चालविल्याचे दिसून येत आहे. अमक्या उमेदवारापेक्षा आपण किती सरस आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत असल्याचे दिसते. कुणी आपला माणूस म्हणून प्रचार करताना दिसतो तर कुणी एक संधी मागत आहे. कुणी पक्षाने कसे डावलले हे सांगत मतदारांना आळवणी करीत आहे तर कुणी पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून शहर विकास साधण्याचे स्वप्न मतदारांना दाखवित आहे. सध्या सर्वच उमेदवारांकडून रॅलींवर भर दिला जात आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी एक दिवस एका भागात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागात रॅली काढली जात आहे. या रॅलीमध्ये सर्वात समोर ढोल-ताशाचे पथक दिसून येत आहे. या पथकाद्वारे विविध ताल वाजवित मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ढोल-ताशाचे सूर कानी पडताच मतदार आपोआपच घराबाहेर निघतात. मग, उमेदवार आणि सोबतची नेते मंडळीही त्यांना हसतमुखाने नमस्कार घेत असल्याचे दिसून येत आहे. रॅलीमधील ढोल-ताशाचे पथक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पूर्वी मोर्चा रॅलीमध्ये ढोल-ताशा, बँड दिसून येत नव्हते; पण आता त्यालाच अधिक महत्त्व आल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकच रॅलीमध्ये बँडबाजाच्या माध्यमातून मतदारांना घराबाहेर निघण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. रिंगणात दंड थोपटून असलेला प्रत्येकच उमेदवार व त्यांच्या नेते मंडळीकडून विविध आश्वासने दिली जात आहे. शहराचा विकास करण्यासह मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची ग्वाहीदेखील दिली जात आहे. निवडणूक काळात मतदार राजा आश्वासनांच्या पावसात न्हाऊन निघत असल्याचेच पाहावयास मिळत आहे.