शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

तूर, चण्यावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:44 IST

तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही.

ठळक मुद्देफवारणीच्या खर्चाने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही. त्यामुळे तुर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यावर्र्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना मात्र शेतातील पिकांवर अनेक रोगांनी आक्रमण केल्याने शेतकरी महागडे किटकनाशक औषध फवारणी करून थकले आहे. फवारणीच्या नादात शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती फारच चिंताग्रस्त आहे. नगदी समजले जाणाऱ्या सोयाबीन पिकाला उतारीच नसल्याने सोयाबीन फारच कमी प्रमाणात पिकले. अनेक शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन पोत्याच्या उत्पादनात समाधान मानावे लागले. त्यामुळे सोयाबीन पेरणीचा खर्च, खत व फवारणी, काढणीचाही खर्च निघाला नाही. नंतर कपाशी पिकावर सर्व शेतकऱ्यांची भिस्त असतांना मात्र या भागात जिल्ह्यात प्रथमच निजामपुर येथील भांगे यांच्या शेतात बोंडअळी आढळल्याने शेतकरी पुरता धास्तावलेला होता. सुरवातीलाच बोंडअळी कपाशी पिकावर आढळल्याने नागपूरपासुन तर जिल्हयातील कृषी विभाग बोंड अळीवर मात करण्यासाठी कामी लागला. योग्य मार्गदर्शनामुळे या भागातील बोंडअळीचे प्रमाण कमी करता आले.नंतर एका महिन्यातच कपाशीवर चुरडा रोगाचे आक्रमण झाले. यातुन कपाशीची परिस्थिती थोडीफार सुधारली असतांना मात्र ऐन कपाशी वेचण्याच्या हंगामातच कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. सुरवातीपासुनच कपाशीवर महागडे विविध प्रकारचे किटकनाशक फवारून शेतकरी पुरता वैतागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोसळले आहे. त्यातच कपाशीच्याही पिकात घट येणार असल्याचे संकेत मिळत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनात आर्वी कृषि विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी