शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

वणा नदीवर होणार नवीन बंधाºयांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 11:23 PM

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला.

ठळक मुद्देजलसंकटावर होणार मात : आमदारांनी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वणा नदीवर तयार करण्यात येत असलेला बंधारा निकृष्ट कामामुळे नापास ठरला. आता नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टिकोनातून निधी आणण्यासाठी आ. समीर कुणावार यांनी कंबर कसल्याचे दिसते.शहराला बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी शहरालगत वाहणारी वणा नदी वरदान ठरली. हिंगणघाट येथे नदीचे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यातील दोन महिने शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. लाखो रुपये खर्च करुन धरणाचे पाणी विकत घेऊन पाणी पुरवठा करण्याची कसरत करावी लागते. पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने हा निरर्थक खर्च होतो. सन २०१० मध्ये वणा नदीचे पाणी अडविण्यासाठी शासनस्तरावर ५ कोटींचा बंधारा मंजूर झाला. बंधाºयासाठी आलेला निधी खर्च होऊन गेला तरी बंधाºयाचे काम अर्धवट राहिले. उन्हाळ्यातील पाणी समस्या लक्षात घेता आ. कुणावर यांनी अर्धवट बंधाºयाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे वाढीव निधीकरिता पाठपुरावा सुरू केला. दरम्यान अर्धवट बंधाºयाच्या घोळा संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर घडलेल्या घडोमोडीतून या अर्धवट बांधलेल्या बंधाºयाची गुणवत्ता परीक्षण विभागाकडून चाचणी करण्यात आली. या चाचणीत ७२ नमून्यापैकी ४० नमूने निकृष्ट ठरविण्यात आले. त्यामुळे आ. कुणावार यांच्या वाढीव निधीच्या मागणीला ब्रेक लागला. दरम्यान हिंगणघाट शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी ६१ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्यातून शहरामध्ये ११ नवीन पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, १८५ कि़मी. ची नवीन पाईप लाईन, नवीन पंपींग मशीन, असा सगळा मोठा डोलारा उभा राहणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. शहरात पाच जलकुंभ असून उन्हाळ्यात नागरिकांना जलसंकटाला सामोरे जावे लागत होते. नवीन बंधारा नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.नवीन बंधारा होणारच : समीर कुणावारआमदार कुणावार यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेतली असता उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून आपण सध्या अपूर्ण व्यवस्थेत असणाºया बंधाºयावर वाढीव निधी मिळून तो बंधारा पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी केली होती. शासनाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. गुणवत्ता चाचणीत या बंधाºयाचे झालेले काम निकृष्ट प्रतीचे निघाल्याने आता या बंधाºयाच्या कामासाठी वाढीव निधी मिळूच शकत नाही. अशातच अमृत योजनेचे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी संचय क्षमता आतापेक्षा खूप जास्त वाढणार आहे. परंतु, अडतच नाही तर शहरात आणणार कोठून, अशी सध्याची स्थिती आहे. याची जाणीव आपण मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना दिली. त्यानुसार मंत्रालयात नवीन बंधारा बांधण्याच्या दृष्टीकोनातून तीन बैठकी झाल्या. लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होईल, असे आ. समीर कुणावार यांनी सांगितले.