शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:25 IST

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष: तणावात असाल तर व्यक्त व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आजच्या वेगवान जगात, कामाच्या ठिकाणी मागणी सतत वाढत आहे. अशावेळी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. मात्र, सातत्याने कर्मचारी दबावात काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यालयात खेळीमेळीचे वातावरण वाढवणे आवश्यक आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून १० ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एक थीम ठरविली जाते. यावर्षी "हीच वेळ आहे, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची" ही थीम ठरविली आहे. दैनंदिन जीवनात आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो. पण, तीच व्यक्ती स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करते. हल्ली वाढती बेरोजगारी, राहणीमानाची पध्दती, आर्थिक अडचणी, स्पर्धा सामाजिक तसेच कौटुंबीक समस्या आणि महत्त्वाचे म्हणजे वाढत्या मोबाइल फोनचे व्यसन यामुळे ज्या ठिकाणावर काम करतो, तिथे मानसिक समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचे पालन न केल्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांवर चिडणे तसेच त्यांनी रागविल्यास बोचऱ्या शब्दांमुळे अनेक व्यक्तिना मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

यातूनच नैराश्य, चिंता, समायोजनाची समस्या, झोपेमध्ये बदल, वजन कमी होणे, अशा मानसिक समस्या उद्भवतात. अशी लक्षणे ताणतणाव उद्भवल्यास जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

मानसिक आजाराची लक्षणे काय?सतत चिंताग्रस्त असणे, जास्त प्रमाणात काळजी, अपुरी झोप, वजन कमी होणे, जेवणाची इच्छा न होणे, कुटुंबापासून दूर होण्याची इच्छा, एकांतात राहणे, व्यसनाच्या आहारी जाणे (दारु, ड्रग्स), न्यूनगंडाची भावना आदी आहे

सकारात्मक मानसिक स्वास्थ्य ठेवण्याच्या या आहेत पद्धती 

  • आपल्या जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, मन रिते करा, नियमित व्यायाम, योगा करा, नियमित फळाचे सेवन करा. 
  • निसर्गाशी जवळीकता साधा, उदा. वृक्षारोपण करा, आवड तसेच छंदाची जोपासना करा. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण करा. झोपेला महत्व द्या, सकारात्मक विचारांचा समावेश करा.

तणावात आहात, येथे व्यक्त व्हा तणावात असलेल्या व्यक्तीला समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मानसिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात आपल्याला टेली मानस टोल फ्री क्रमांक १४४१६ / १८००८९१४४१६ या क्रमांकावर फोन करून व्यक्त व्हायचे आहे.

"सर्व आरोग्याप्रमाणे, जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा उपचारापेक्षा प्रतिबंध करणे चांगले असते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी विश्रांती महत्त्वाची आहे. त्यामुळे, कामाच्या ठिकाणी, एखाद्या कर्मचाऱ्याने आजारी पडलेल्या स्थितीपर्यंत स्वतःला ढकलण्यापेक्षा एक दिवस सुटी घेऊन कुटुंबीयांशी, जवळच्या व्यक्तीशी वेळ घालविणे केव्हाही चांगले."- मोनाली मोहलें (नाखले) मानसशास्त्रज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा

"कर्मचारी अशा वातावरणाचा शोध घेतात जिथे त्याच्या कामाची किंमत असते. आरोग्याशी तडजोड न करता कामाच्या भाराबरोबरच अपेक्षांचे ओझे ओढले जाते. निरोगी मन हे निरोगी शरीराइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुसंवाद असणे गरजेचे आहे." - डॉ. सिस्टर सँली जॉन, सह. प्रा. मानसोपचार विभाग, सेवाग्राम

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यwardha-acवर्धा