शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:25 IST

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष: तणावात असाल तर व्यक्त व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आजच्या वेगवान जगात, कामाच्या ठिकाणी मागणी सतत वाढत आहे. अशावेळी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. मात्र, सातत्याने कर्मचारी दबावात काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यालयात खेळीमेळीचे वातावरण वाढवणे आवश्यक आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून १० ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एक थीम ठरविली जाते. यावर्षी "हीच वेळ आहे, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची" ही थीम ठरविली आहे. दैनंदिन जीवनात आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो. पण, तीच व्यक्ती स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करते. हल्ली वाढती बेरोजगारी, राहणीमानाची पध्दती, आर्थिक अडचणी, स्पर्धा सामाजिक तसेच कौटुंबीक समस्या आणि महत्त्वाचे म्हणजे वाढत्या मोबाइल फोनचे व्यसन यामुळे ज्या ठिकाणावर काम करतो, तिथे मानसिक समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचे पालन न केल्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांवर चिडणे तसेच त्यांनी रागविल्यास बोचऱ्या शब्दांमुळे अनेक व्यक्तिना मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

यातूनच नैराश्य, चिंता, समायोजनाची समस्या, झोपेमध्ये बदल, वजन कमी होणे, अशा मानसिक समस्या उद्भवतात. अशी लक्षणे ताणतणाव उद्भवल्यास जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

मानसिक आजाराची लक्षणे काय?सतत चिंताग्रस्त असणे, जास्त प्रमाणात काळजी, अपुरी झोप, वजन कमी होणे, जेवणाची इच्छा न होणे, कुटुंबापासून दूर होण्याची इच्छा, एकांतात राहणे, व्यसनाच्या आहारी जाणे (दारु, ड्रग्स), न्यूनगंडाची भावना आदी आहे

सकारात्मक मानसिक स्वास्थ्य ठेवण्याच्या या आहेत पद्धती 

  • आपल्या जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, मन रिते करा, नियमित व्यायाम, योगा करा, नियमित फळाचे सेवन करा. 
  • निसर्गाशी जवळीकता साधा, उदा. वृक्षारोपण करा, आवड तसेच छंदाची जोपासना करा. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण करा. झोपेला महत्व द्या, सकारात्मक विचारांचा समावेश करा.

तणावात आहात, येथे व्यक्त व्हा तणावात असलेल्या व्यक्तीला समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मानसिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात आपल्याला टेली मानस टोल फ्री क्रमांक १४४१६ / १८००८९१४४१६ या क्रमांकावर फोन करून व्यक्त व्हायचे आहे.

"सर्व आरोग्याप्रमाणे, जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा उपचारापेक्षा प्रतिबंध करणे चांगले असते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी विश्रांती महत्त्वाची आहे. त्यामुळे, कामाच्या ठिकाणी, एखाद्या कर्मचाऱ्याने आजारी पडलेल्या स्थितीपर्यंत स्वतःला ढकलण्यापेक्षा एक दिवस सुटी घेऊन कुटुंबीयांशी, जवळच्या व्यक्तीशी वेळ घालविणे केव्हाही चांगले."- मोनाली मोहलें (नाखले) मानसशास्त्रज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा

"कर्मचारी अशा वातावरणाचा शोध घेतात जिथे त्याच्या कामाची किंमत असते. आरोग्याशी तडजोड न करता कामाच्या भाराबरोबरच अपेक्षांचे ओझे ओढले जाते. निरोगी मन हे निरोगी शरीराइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुसंवाद असणे गरजेचे आहे." - डॉ. सिस्टर सँली जॉन, सह. प्रा. मानसोपचार विभाग, सेवाग्राम

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यwardha-acवर्धा