शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:25 IST

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष: तणावात असाल तर व्यक्त व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आजच्या वेगवान जगात, कामाच्या ठिकाणी मागणी सतत वाढत आहे. अशावेळी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. मात्र, सातत्याने कर्मचारी दबावात काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यालयात खेळीमेळीचे वातावरण वाढवणे आवश्यक आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून १० ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून एक थीम ठरविली जाते. यावर्षी "हीच वेळ आहे, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची" ही थीम ठरविली आहे. दैनंदिन जीवनात आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेतो. पण, तीच व्यक्ती स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करते. हल्ली वाढती बेरोजगारी, राहणीमानाची पध्दती, आर्थिक अडचणी, स्पर्धा सामाजिक तसेच कौटुंबीक समस्या आणि महत्त्वाचे म्हणजे वाढत्या मोबाइल फोनचे व्यसन यामुळे ज्या ठिकाणावर काम करतो, तिथे मानसिक समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचे पालन न केल्यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांवर चिडणे तसेच त्यांनी रागविल्यास बोचऱ्या शब्दांमुळे अनेक व्यक्तिना मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.

यातूनच नैराश्य, चिंता, समायोजनाची समस्या, झोपेमध्ये बदल, वजन कमी होणे, अशा मानसिक समस्या उद्भवतात. अशी लक्षणे ताणतणाव उद्भवल्यास जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. 

मानसिक आजाराची लक्षणे काय?सतत चिंताग्रस्त असणे, जास्त प्रमाणात काळजी, अपुरी झोप, वजन कमी होणे, जेवणाची इच्छा न होणे, कुटुंबापासून दूर होण्याची इच्छा, एकांतात राहणे, व्यसनाच्या आहारी जाणे (दारु, ड्रग्स), न्यूनगंडाची भावना आदी आहे

सकारात्मक मानसिक स्वास्थ्य ठेवण्याच्या या आहेत पद्धती 

  • आपल्या जवळच्या व्यक्तीशी व्यक्त व्हा, मन रिते करा, नियमित व्यायाम, योगा करा, नियमित फळाचे सेवन करा. 
  • निसर्गाशी जवळीकता साधा, उदा. वृक्षारोपण करा, आवड तसेच छंदाची जोपासना करा. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण करा. झोपेला महत्व द्या, सकारात्मक विचारांचा समावेश करा.

तणावात आहात, येथे व्यक्त व्हा तणावात असलेल्या व्यक्तीला समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मानसिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात आपल्याला टेली मानस टोल फ्री क्रमांक १४४१६ / १८००८९१४४१६ या क्रमांकावर फोन करून व्यक्त व्हायचे आहे.

"सर्व आरोग्याप्रमाणे, जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा उपचारापेक्षा प्रतिबंध करणे चांगले असते. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी विश्रांती महत्त्वाची आहे. त्यामुळे, कामाच्या ठिकाणी, एखाद्या कर्मचाऱ्याने आजारी पडलेल्या स्थितीपर्यंत स्वतःला ढकलण्यापेक्षा एक दिवस सुटी घेऊन कुटुंबीयांशी, जवळच्या व्यक्तीशी वेळ घालविणे केव्हाही चांगले."- मोनाली मोहलें (नाखले) मानसशास्त्रज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा

"कर्मचारी अशा वातावरणाचा शोध घेतात जिथे त्याच्या कामाची किंमत असते. आरोग्याशी तडजोड न करता कामाच्या भाराबरोबरच अपेक्षांचे ओझे ओढले जाते. निरोगी मन हे निरोगी शरीराइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुसंवाद असणे गरजेचे आहे." - डॉ. सिस्टर सँली जॉन, सह. प्रा. मानसोपचार विभाग, सेवाग्राम

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यwardha-acवर्धा