शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते.

ठळक मुद्देअग्निहोत्री : पंतप्रधानांशी पत्रव्यवहार

वर्धा : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कारखानदारी वस्तूंची अधिकतम विक्री किंमत निर्मिती मूल्यापेक्षा अधिकतम विक्री किंमत कितीतरी पटीने जास्त असते. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. किरकोळ व्यापारी एमआरपीनुसारच वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे सर्वसामान्याची खूप लूट होत असून महागाई वाढतच आहे. त्यामुळे वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली.शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते. ती अतिशय कमी म्हणजे उत्पादन किमतीपेक्षाही कमी असते.त्यामुळे शेतीकरिता लागलेला खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट व गंभीर होते. जर कारखानदारी उत्पादन वस्तूंवर जास्तीत जास्त विक्री किंमत (एम.आर.पी.) नमूद असते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूंवर (एल.आर.पी.) जीवन जगण्याएवढी विक्री किंमत शासनाने निर्धारित करावी.शेतकºयांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के जीवन जगण्याएवढ्या श्रमाची किंमत (एल.आर.पी.) निर्धारित केल्यास त्याला जीवन जगण्याएवढे उत्पन्न शेतीतून प्राप्त होऊ शकते. यामुळे तो आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाही, असे अग्निहोत्री म्हणाले.या मुद्यांकडे शासनाने लक्ष द्यावेशासनाने आवश्यक उपाययोजना म्हणून सर्व वस्तूंच्या उत्पादन किमतीबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या वस्तूंची अधिकतम विक्री किंमत ठरवावी, म्हणजे वस्तूंच्या किंमती आपोआपच कमी होईल. परिणामी महागाई कमी होईल आणि जनसामान्याचे जीवन सुखमय होईल, असे पत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविल्याचेही व्यासपीठावर बोलताना शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी