शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पादित मालाला दीडपट भाव निर्धारित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली. शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते.

ठळक मुद्देअग्निहोत्री : पंतप्रधानांशी पत्रव्यवहार

वर्धा : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कारखानदारी वस्तूंची अधिकतम विक्री किंमत निर्मिती मूल्यापेक्षा अधिकतम विक्री किंमत कितीतरी पटीने जास्त असते. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. किरकोळ व्यापारी एमआरपीनुसारच वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे सर्वसामान्याची खूप लूट होत असून महागाई वाढतच आहे. त्यामुळे वस्तूंची अधिकतम विक्री किंमत शासनाने निर्धारित करून त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी लोकमत व्यासपीठावर केली.शेतकरी शेतामध्ये जे उत्पन्न घेतात, त्याकरिता खते, बियाणे, कीटकनाशके, रसायने यांचा वापर करतात, मशागत करतात यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात; मात्र शेतमालाची किंमत शासन निर्धारित करते. ती अतिशय कमी म्हणजे उत्पादन किमतीपेक्षाही कमी असते.त्यामुळे शेतीकरिता लागलेला खर्चसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट व गंभीर होते. जर कारखानदारी उत्पादन वस्तूंवर जास्तीत जास्त विक्री किंमत (एम.आर.पी.) नमूद असते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पादित वस्तूंवर (एल.आर.पी.) जीवन जगण्याएवढी विक्री किंमत शासनाने निर्धारित करावी.शेतकºयांनी उत्पादित केलेल्या वस्तूंवर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के जीवन जगण्याएवढ्या श्रमाची किंमत (एल.आर.पी.) निर्धारित केल्यास त्याला जीवन जगण्याएवढे उत्पन्न शेतीतून प्राप्त होऊ शकते. यामुळे तो आत्महत्येसारखे पाऊल उचलणार नाही, असे अग्निहोत्री म्हणाले.या मुद्यांकडे शासनाने लक्ष द्यावेशासनाने आवश्यक उपाययोजना म्हणून सर्व वस्तूंच्या उत्पादन किमतीबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या वस्तूंची अधिकतम विक्री किंमत ठरवावी, म्हणजे वस्तूंच्या किंमती आपोआपच कमी होईल. परिणामी महागाई कमी होईल आणि जनसामान्याचे जीवन सुखमय होईल, असे पत्र नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविल्याचेही व्यासपीठावर बोलताना शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी