शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीनिमित्त जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. पावसाळा ओसरला की गांधी जयंती येते. सर्व स्मारके माती, लाकूड, बोरे, बांबू आदींपासून बनविण्यात आलेली आहे. परिसर प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आहे. संपूर्ण परिसरात बद्री अंथरलेली आहे.

ठळक मुद्देरंगरंगोटीला वेग : २ ऑक्टोबरला आश्रमात उसळणार जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत.पावसाळा ओसरला की गांधी जयंती येते. सर्व स्मारके माती, लाकूड, बोरे, बांबू आदींपासून बनविण्यात आलेली आहे. परिसर प्रकारच्या फुलझाडांनी नटलेला आहे. संपूर्ण परिसरात बद्री अंथरलेली आहे.मातीची लिपाई, सारवण, गवत काढणे, बल्ली, बांबू, लाकूड आदींना तेल-पाणी, विटांना गेरू, झाडांना पिवळी माती आणि गेरू अशी कामे जयंतीपूर्वी केली जातात. जवळपास सर्वच कामे झालेली असून काही अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. या कामांमुळे वातावरणात व आश्रमाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. तयारी होत असली तरी पावसाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे पहिल्यांदा सारवण होऊनही झांज्या व झापड्याा काढण्यात आलेल्या नाहीत.सप्टेंबर महिना संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. हस्ती नक्षत्र सुरू आहे. जोरदार पावसाची शक्यता असल्याने झांज्या व झापड्या काढण्यात आलेल्या नाही. आश्रमात गांधीजींची जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते.यंदा या दिवशी राष्ट्रपित्याला १५० व्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात येणार आहे. आश्रमात शाळा, महाविद्यालय, संस्था, सामाजिक संघटना, गांधीवादी, अभ्यासक आदी कार्यकर्ते आश्रमातील कार्यक्रमात भाग घेतात. यातून बापूंचा विचार व कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.गांधी जयंती पर्वावर कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर यात्रामहात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीचे १५० वर्ष आहे. तसेच आचार्य विनोबा भावे यांचे १२५ वे जयंती वर्ष असून महामानवांचा विचार व कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केरळ येथील पाच युवकांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर अशी मोटरसायकल यात्रा काढून आपली आदरांजली वाहणार आहे. शुक्रवारला यात्रेकरूंनी सेवाग्राम आश्रमला भेट दिली. २१ सप्टेंबर रोजी या यात्रेला प्रारंभ झाला. तीन हजार किमीचा प्रवास सेवाग्राममध्ये पूर्ण झाला आहे. सेंटर फाँर लाईफ लर्निंग या संघटने अंतर्गत ही यात्रा असल्याचे यात्रा प्रमुख अशोक यांनी सांगितले. पुढे जय जगतचा नारा पण आम्ही बुलंद करणार आहोत. एकता परिषदचे पी.वी.राजगोपाल विश्व शांती पदयात्रा काढणार असून गांधीजींच्या जयंती दिनी राजघाट नयी दिल्ली येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. यात आम्ही दोन दिवस सहभागी होणार आहोत.त्यानंतर ४ आॅक्टोबरला पुढील प्रवास सुरू होणार असल्याचेही अशोक यांनी सांगितले. सेवाग्राम येथील आश्रमात दोन दिवस मुक्काम केला असून त्यांनी आश्रमाच्या प्रार्थनेत सहभाग नोंदविला. स्मारक आणि आश्रमचा इतिहास जाणून घेतला तसेच दैनंदिन कार्य समजावून घेतले. या यात्रेत अशोक सह प्रसाद, विष्णू, यदू व संजू या पाच युवकांचा समावेश आहे. अशोक व प्रसाद हे नोकरी करतात तर बाकी तीन महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक