शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
3
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
4
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
5
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
6
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
7
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
8
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
9
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
10
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
11
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
12
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
13
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
14
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
15
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
16
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
17
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
18
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
19
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
20
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

प्राथमिक नियमित तर माध्यमिक शाळा एक दिवसाआडला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

शासनाने नुकताच वर्गनिहाय शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, तत्पूर्वी शिक्षणात खंड पडू नये याकरिता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करता येईल काय? नियमित शाळा सुरु करण्याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. आपल्याही जिल्ह्यात प्राथमिकच्या १ हजार २१६ तर माध्यमिकच्या ३६० शाळांची माहिती गोळा करण्यात आली.

ठळक मुद्देपालकांनी नोंदविले मत : शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण ही गरज आहे पण, आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असल्याने या कोविड-१९ च्या काळात शाळा सुरु करण्याच्या नियोजनासंदर्भात शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण केले असता प्राथमिक शाळेतील सर्वाधिक ४०.८ टक्के पालकांनी नियमित तर माध्यमिकच्या सर्वाधिक ४३. ३ टक्के पालकांनी एक दिवसाआड शाळा सुरु करण्यास पसंती दर्शविली आहे. सकाळ-दुपारच्या सत्रात शाळा सुरु करा म्हणणाऱ्यांचीही संख्या बरीच आहेत.शासनाने नुकताच वर्गनिहाय शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पण, तत्पूर्वी शिक्षणात खंड पडू नये याकरिता ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु करता येईल काय? नियमित शाळा सुरु करण्याबाबत काय अडचणी आहेत, याची माहिती जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. आपल्याही जिल्ह्यात प्राथमिकच्या १ हजार २१६ तर माध्यमिकच्या ३६० शाळांची माहिती गोळा करण्यात आली. ९८ हजार ७९८ विद्यार्थी प्राथमिकचे तर १ लाख १३ हजार ७६९ विद्यार्थी माध्यमिकचे शिक्षण घेत आहेत. प्राथमिकचे शिक्षण घेणाऱ्या ३१.६२ तर माध्यमिकचे शिक्षण घेणाऱ्या ६५.६३ टक्के पालक किंवा विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पद्धती फारसी उपयुक्त ठरणार नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात प्राथमिकच्या ७९.३ टक्के शाळा शासकीय असून माध्यमिकच्या ६९.६ टक्के शाळा या खासगी आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अभाव दिसून येतो. म्हणूनच या अडचणी लक्षात घेता प्राथमिकच्या विद्यार्थ्यांच्या ४०.८ टक्के पालकांनी नियमित, ३४.८ टक्के पालकांनी एक दिवसाआड तर २६.७ टक्के पालकांनी सकाळ-दुपार सत्राला पसंती दर्शविली आहे. माध्यमिक विभागाचे चित्र यापेक्षा वेगळे असून २६ टक्के पालकांनी नियमित, ४३.३ टक्के पालकांनी एक दिवसाआड तर ३७.२ टक्के पालकांनी सकाळ-दुपारच्या सत्राला प्राधान्य दिले आहे. आता या सर्वेक्षणांती शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभाग काय निर्णय घेईल, हे येणारी वेळच सांगणार आहे.शिक्षकांकडे स्मार्ट फोन; पण दीक्षा अ‍ॅपचा विसरप्राथमिक शाळेमध्ये ४,०५८ शिक्षक कार्यरत असून त्यापैकी २,४५९ शिक्षक तंत्रस्नेही आहेत. माध्यमिकमध्ये ३,८९९ शिक्षक असून त्यापैकी १,२४० शिक्षक तंत्रस्नेही आहे. या शिक्षकांकडे स्मार्ट फोन असूनही ते दीक्षा अ‍ॅपचा वापर करीत नाही. प्राथमिकच्या ६३.८३ टक्के शिक्षकांकडे स्मार्ट फोन आहेत व ५५.०९ शिक्षकच दीक्षा अ‍ॅपचा वापर करीत आहे.ग्रामीण शाळांमध्ये इंटनेट सुविधांचा अभावग्रामीण भागामध्ये प्राथमिकच्या केवळ १४.९ तर माध्यमिकच्या ४५.८ टक्के शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ४९.८ टक्के प्राथमिक आणि ५५.३ टक्के माध्यमिक शाळेत ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही आता सेवासुविधा पुरविण्याची गरज कोरोनामुळे निर्माण झाली आहे.शाळा सुरु करण्याबाबत पूर्व तयारीचा आढावा घेण्याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ही माहिती घेण्यात आली. सर्वच निर्णय जिल्हा पातळीवरुन घेणे शक्य नसल्याने गाव पातळीवरील शाळा व्यवस्थापन समिती तसेच लोकप्रतिनिधींचेही मत नोंदविण्यात आले. आता आरोग्याची काळजी घेण्यासोबतच शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

टॅग्स :Schoolशाळा