शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा १२६ गावांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४० हेक्टर वरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ११ हजार ५०० हेक्टरवरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकपाशीचे सर्वाधिक नुकसान : २,३०८ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, फळ पिकांनाही बसला तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील आठवड्यात थंडीचा जोर कायम राहत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. याच पावसाचा जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांना चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसाने सुमारे २ हजार ३०८ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली असून कपाशीचे सर्वाधिक नुकसान केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. शिवाय तसा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी झाल्या. तर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आर्वी आणि कारंजा (घा.) तालुक्यातील काही भागात गारपीट झाले. यामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ८४० हेक्टर वरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ११ हजार ५०० हेक्टरवरील कपाशी पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. तर १५ हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्केच्या आत तसेच ४,३०० हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. १२ हेक्टरवरील चणा पिकाचे ३३ टक्क्यांच्या आत तर १,१०० हेक्टर वरील चणा पिकाचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. ५ हेक्टरवरील गहू पिकाचे ३३ टक्क्यांच्या आत तर ७०० हेक्टर वरील गहू पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. १२५ हेक्टर पिकावरील फळ पिकाचे ३३ टक्केच्या आत तर ३२५ हेक्टरवरील फळ पिकाचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. १० हेक्टरवरील भाजीपाला वर्गीय पिकाचे ३३ टक्केच्या आत तर १४० हेक्टरवरील भाजीपाला वर्गीय पिकांचे ३३ टक्केच्या वर नुकसान झाले आहे. सदर नुकसानग्रस्त शेतकºयांना कुठलाही नियम व अटी लागू न करता शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.आर्वी तालुक्यात सर्वाधिक नुकसानअवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ८७४ हेक्टर, आर्वी तालुक्यातील १८,००० हेक्टर, कारंजा (घा.) तालुक्यातील १८८ हेक्टरवरील पिकाचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. असे असले तरी सेलू, देवळी, आष्टी (श.), हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील उभ्या पिकाचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची नोंद कृषी विभागाने प्राथमिक अहवालात घेतली असून ज्या शेतकºयाचे नुकसान झाले असेल अशांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Rainपाऊस