शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा; प्राजक्त तनपुरेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 12:32 IST

आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले.

ठळक मुद्दे१० हजार कोटींवरून कृषिपंपांची थकबाकी नेली ४० हजार काेटींवर

वर्धा : राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातच १० हजार कोटींवरील कृषिपंपांची थकबाकी ४० हजार कोटींवर गेल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा आहे, अशी टीका राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वर्धा येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली.

तनपुरे पुढे म्हणाले, इतर राज्यांनी छोट्या-मोठ्या कंपन्यांना भरीव मदत केली; परंतु, राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात महावितरणला तुटपुंजी मदत करण्यात आली. त्यामुळे या कंपनीच्या नुकसानीत अधिकच भर पडली. उदय योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीला केवळ ४ हजार कोटींची मदत करण्यात आली आहे. केवळ कागदावर नफा दाखविण्यात आला. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण खुले आव्हान देतो की, त्यांनी समोरासमोर यावे. आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही याप्रसंगी तनपुरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, सुबोध मोहिते, अतुल वांदिले, सुनील राऊत, अभिजित फाळके, आदींची उपस्थिती होती.

नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढणार

आगामी नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. असे असले तरी स्थानिक परिस्थिती बघूनही काही निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनात घेण्यात येईल, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे