शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा; प्राजक्त तनपुरेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 12:32 IST

आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले.

ठळक मुद्दे१० हजार कोटींवरून कृषिपंपांची थकबाकी नेली ४० हजार काेटींवर

वर्धा : राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातच १० हजार कोटींवरील कृषिपंपांची थकबाकी ४० हजार कोटींवर गेल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा आहे, अशी टीका राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वर्धा येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली.

तनपुरे पुढे म्हणाले, इतर राज्यांनी छोट्या-मोठ्या कंपन्यांना भरीव मदत केली; परंतु, राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात महावितरणला तुटपुंजी मदत करण्यात आली. त्यामुळे या कंपनीच्या नुकसानीत अधिकच भर पडली. उदय योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीला केवळ ४ हजार कोटींची मदत करण्यात आली आहे. केवळ कागदावर नफा दाखविण्यात आला. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण खुले आव्हान देतो की, त्यांनी समोरासमोर यावे. आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही याप्रसंगी तनपुरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, सुबोध मोहिते, अतुल वांदिले, सुनील राऊत, अभिजित फाळके, आदींची उपस्थिती होती.

नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढणार

आगामी नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. असे असले तरी स्थानिक परिस्थिती बघूनही काही निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनात घेण्यात येईल, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे