शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा; प्राजक्त तनपुरेंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 12:32 IST

आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले.

ठळक मुद्दे१० हजार कोटींवरून कृषिपंपांची थकबाकी नेली ४० हजार काेटींवर

वर्धा : राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातच १० हजार कोटींवरील कृषिपंपांची थकबाकी ४० हजार कोटींवर गेल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा आहे, अशी टीका राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वर्धा येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली.

तनपुरे पुढे म्हणाले, इतर राज्यांनी छोट्या-मोठ्या कंपन्यांना भरीव मदत केली; परंतु, राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात महावितरणला तुटपुंजी मदत करण्यात आली. त्यामुळे या कंपनीच्या नुकसानीत अधिकच भर पडली. उदय योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीला केवळ ४ हजार कोटींची मदत करण्यात आली आहे. केवळ कागदावर नफा दाखविण्यात आला. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण खुले आव्हान देतो की, त्यांनी समोरासमोर यावे. आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही याप्रसंगी तनपुरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, सुबोध मोहिते, अतुल वांदिले, सुनील राऊत, अभिजित फाळके, आदींची उपस्थिती होती.

नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढणार

आगामी नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. असे असले तरी स्थानिक परिस्थिती बघूनही काही निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनात घेण्यात येईल, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे