शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

धाम नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:41 IST

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीवितहानी टळली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली/ खरांगणा (मो.) : खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे मुल्यांकन केले नसल्याने ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.धाम नदीवरील हा राज्य महामार्गावर असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या पुलाचे बांधकाम साधारणत: १९६४ मध्ये झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान या पुलावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक झाली. हा मार्ग मध्यप्रदेशात जाण्यासाठी सोयीचा असल्याने या मार्गामुळे जवळपास १०० किलो मीटरचा फेरा वाचतो. या मार्गावर कोणताही टोलनाका नसल्याने ट्रक, कंटेनरची मोठी वर्दळ असते. या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी रात्री या पुलाचा मधातील एक खांब खचल्याने पुलही तुटला. घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष शेगांवकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी लगेच या मार्गावरील वाहतूक बंद करुन वर्धेकडे जाणारी वाहतूक बांगडापूर-माळेगाव-आकोली मार्गे वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भित्रे यांनीही घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता साखरवाडे आणि नागपुरातील अधिकारीही घटनास्थळाला भेट देणार असल्याचे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले.या पुलाची एक बाजू खचायला लागली होती. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाचे आॅडिट होणे गरजेचे होते, पण ते केले गेले नाही.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळेच हा पुल खचला.- राजू राठी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, मोरांगणामहाकालीचे प्रसिद्ध देवस्थान या मार्गावर आहे. ज्यावेळी पुलाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक नव्हती. नंतरच्या काळात मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरल्याने वाहतूक वाढली. लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करुन मार्ग मोकळा करावा. त्यामुळे लोकांना लांब पल्ल्याने जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.-नितीन अरबट, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :riverनदी