शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

धाम नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:41 IST

खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजीवितहानी टळली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली/ खरांगणा (मो.) : खरांगणा (मोरांगणा) ते कारंजा-कांढळी मार्गावरील धाम नदीवर असलेल्या पाच दशकापूर्वीचा पुल अचानक खचला. ही घटना सोमवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान घडल्याने मोठी जीवितहानी टळली. या मार्गावरील वाहतूक ही बांगडापूर मार्गाने वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे मुल्यांकन केले नसल्याने ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.धाम नदीवरील हा राज्य महामार्गावर असल्याने तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या पुलाचे बांधकाम साधारणत: १९६४ मध्ये झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान या पुलावरुन मोठ्या प्रमाणात जड वाहतूक झाली. हा मार्ग मध्यप्रदेशात जाण्यासाठी सोयीचा असल्याने या मार्गामुळे जवळपास १०० किलो मीटरचा फेरा वाचतो. या मार्गावर कोणताही टोलनाका नसल्याने ट्रक, कंटेनरची मोठी वर्दळ असते. या पुलाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी रात्री या पुलाचा मधातील एक खांब खचल्याने पुलही तुटला. घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संतोष शेगांवकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी लगेच या मार्गावरील वाहतूक बंद करुन वर्धेकडे जाणारी वाहतूक बांगडापूर-माळेगाव-आकोली मार्गे वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता भित्रे यांनीही घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता साखरवाडे आणि नागपुरातील अधिकारीही घटनास्थळाला भेट देणार असल्याचे उपस्थित अधिकाºयांनी सांगितले.या पुलाची एक बाजू खचायला लागली होती. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. या पुलाचे आॅडिट होणे गरजेचे होते, पण ते केले गेले नाही.बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळेच हा पुल खचला.- राजू राठी, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, मोरांगणामहाकालीचे प्रसिद्ध देवस्थान या मार्गावर आहे. ज्यावेळी पुलाचे बांधकाम करण्यात आले त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक नव्हती. नंतरच्या काळात मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरल्याने वाहतूक वाढली. लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करुन मार्ग मोकळा करावा. त्यामुळे लोकांना लांब पल्ल्याने जाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.-नितीन अरबट, पंचायत समिती सदस्य

टॅग्स :riverनदी