शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:33 IST

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.

ठळक मुद्देध्येयवेड्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग : नांदी फाऊंडेशनचे लाभले सहकार्य

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.केळापुर येथील शेतकरी वंदन नारायण जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळिंबाची बाग फुलविली आहे. शिवाय सध्या भरघोस फळानी ही बाग बहरली आहे. शेतकरी वंदन जाधव यांच्याकडे ५ एकर ओलिताची शेती आहे. त्यांनी दोन एकर शेतात नांदी फाऊंडेशनच्यावतीने २०१५-१६ साली डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. तसेच दोन एकर शेतातील डाळींब झाडांची दोन विभागामध्ये विभागणी केली. एक एकर शेतातील झाडे अंबीया बहरा करीता तर एक एकर शेतातील झाडे मृग बहराकरिता तयार करण्यात आले. अंबीया बहराचे डाळींब फळ तोडण्या योग्य झाले आहेत. तर मृग बहराच्या झाडांची पाहणी केल्यावर फळ कळी धरण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसते. फळाच्या वजनाने काही झाडे वाकली आहेत. एका झाडाला किमान ३०-४० फळ आहेत. तर एका फळाचे वजन २०० ते ४०० ग्रॅम पर्यंत आहेत. सेंद्रिय डाळींबाना बाजार पेठेत अधिक प्रमाणात मागणी आहे. उत्पन्न घेण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे नक्की उत्पन्न किती होईल, हे सांगणे कठीण असल्याचे शेतकरी सांगतो.सरासरी १०० रुपये भाव मिळण्याची अपेक्षाबाजार भावा नुसार १५० ग्रॅम वजनाचे डाळींब प्रतिकिलो ६० रूपये प्रमाणे आहेत. तर २०० ग्रॅमचेवर ८० रूपये, आणि ३०० ग्रॅम वजनच्या वर प्रतिकिलो १२० रूपयेप्रमाणे आहेत. इतकेच नव्हे, तर सरासरी १०० रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकºयाला आहे.रासायनिक खतांचा वापर नाहीचया डाळीबांच्या बागेमध्ये सुरूवातीपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधी वापरण्यात आली नाही. गरज भासल्यावर सेंद्रिय खत देत औषधांची फवारणी करण्यात आली.धुऱ्यावर शेवग्याची झाडेरासायनिक शेतीचा प्रार्दुभाव डाळिंबाच्या झाडांवर होऊ नये याकरिता धुºयावर शेवगाची झाडे लावण्यता आली. यामुळे डाळिंबाच्या झाडांना वादळाचा पाहिजे तसा फटका सहन करावा लागत नाही. शिवाय काही प्रमाणात उष्ण तापमानाचा प्रभाव कमी करता येत असल्याचे शेतकरी सांगतो. या शेतकºयाचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, शैलेंद्र डेचेलवार, प्रकाश चावळे, पुरूषोत्तम मुंजेवार, संदीप चावक, दत्ता महाजन, कुलदीप बैस, सूर्यकांत बोरकर यांनीही सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग तयार केल्याचे सांगण्यात येते.