शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
6
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
8
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
9
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
10
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
11
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
12
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
13
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
14
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
15
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
16
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
17
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
18
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
19
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
20
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता

मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:33 IST

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.

ठळक मुद्देध्येयवेड्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग : नांदी फाऊंडेशनचे लाभले सहकार्य

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बºयापैकी उत्पन्नही घेतले. विशेष म्हणजे या शेतकºयाला नांदी फाऊंडेशनचे सहकार्य लाभले.केळापुर येथील शेतकरी वंदन नारायण जाधव यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळिंबाची बाग फुलविली आहे. शिवाय सध्या भरघोस फळानी ही बाग बहरली आहे. शेतकरी वंदन जाधव यांच्याकडे ५ एकर ओलिताची शेती आहे. त्यांनी दोन एकर शेतात नांदी फाऊंडेशनच्यावतीने २०१५-१६ साली डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. तसेच दोन एकर शेतातील डाळींब झाडांची दोन विभागामध्ये विभागणी केली. एक एकर शेतातील झाडे अंबीया बहरा करीता तर एक एकर शेतातील झाडे मृग बहराकरिता तयार करण्यात आले. अंबीया बहराचे डाळींब फळ तोडण्या योग्य झाले आहेत. तर मृग बहराच्या झाडांची पाहणी केल्यावर फळ कळी धरण्याच्या अवस्थेत असल्याचे दिसते. फळाच्या वजनाने काही झाडे वाकली आहेत. एका झाडाला किमान ३०-४० फळ आहेत. तर एका फळाचे वजन २०० ते ४०० ग्रॅम पर्यंत आहेत. सेंद्रिय डाळींबाना बाजार पेठेत अधिक प्रमाणात मागणी आहे. उत्पन्न घेण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे नक्की उत्पन्न किती होईल, हे सांगणे कठीण असल्याचे शेतकरी सांगतो.सरासरी १०० रुपये भाव मिळण्याची अपेक्षाबाजार भावा नुसार १५० ग्रॅम वजनाचे डाळींब प्रतिकिलो ६० रूपये प्रमाणे आहेत. तर २०० ग्रॅमचेवर ८० रूपये, आणि ३०० ग्रॅम वजनच्या वर प्रतिकिलो १२० रूपयेप्रमाणे आहेत. इतकेच नव्हे, तर सरासरी १०० रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकºयाला आहे.रासायनिक खतांचा वापर नाहीचया डाळीबांच्या बागेमध्ये सुरूवातीपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा औषधी वापरण्यात आली नाही. गरज भासल्यावर सेंद्रिय खत देत औषधांची फवारणी करण्यात आली.धुऱ्यावर शेवग्याची झाडेरासायनिक शेतीचा प्रार्दुभाव डाळिंबाच्या झाडांवर होऊ नये याकरिता धुºयावर शेवगाची झाडे लावण्यता आली. यामुळे डाळिंबाच्या झाडांना वादळाचा पाहिजे तसा फटका सहन करावा लागत नाही. शिवाय काही प्रमाणात उष्ण तापमानाचा प्रभाव कमी करता येत असल्याचे शेतकरी सांगतो. या शेतकºयाचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. विशेष म्हणजे, शैलेंद्र डेचेलवार, प्रकाश चावळे, पुरूषोत्तम मुंजेवार, संदीप चावक, दत्ता महाजन, कुलदीप बैस, सूर्यकांत बोरकर यांनीही सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग तयार केल्याचे सांगण्यात येते.