शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

‘खाकी’ची माणुसकी; निराधार महिलेस उभारुन दिला उदरनिर्वाहाचा व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 14:19 IST

वयोवृद्ध महिला व मुलगी या दोघी आर्वी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्याकडेला बांबूची छोटी झोपडी उभारुन तेथे झुणका-भाकर विक्री करीत होत्या. मात्र, अचानक बांबूच्या उभारलेल्या छोट्या झोपडीला आग लागून सर्वच साहित्य खाक झाले.

ठळक मुद्देखानावळीला आग लागून खाक झाली होती झोपडीआर्थिक मदत देऊन दिला आधार

वर्धा : निराधार असलेल्या माय-लेकी १० वर्षांपासून आर्वी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यालगत छोटी खानावळ चालवून उपजीविका करीत होत्या; मात्र अचानक बांबूच्या उभारलेल्या छोट्या झोपडीला आग लागून सर्वच साहित्य खाक झाले. अखेर ‘खाकी’ने माणुसकी दाखवून आर्थिक मदत देऊन त्या म्हातारीला पुन्हा झोपडी उभारुन देत खानावळीचे साहित्य आणून तिला मायेची ऊब दिली.

रेश्मा सावरकर ही वयोवृद्ध आणि मुलगी मीना रा. विठ्ठल वॉर्ड या दोघींनी आर्वी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्याकडेला बांबूची छोटी झोपडी उभारुन तेथे झुणका-भाकर विक्री करीत होत्या; मात्र रात्रीच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागून सर्व साहित्य खाक झाले. दुसऱ्या दिवशी त्या झोपडीजवळ आल्या असता त्यांना ही बाब दिसली. नशिबाला दोष देत त्या घरी परत गेल्या. आठ दिवसांचा कालावधी उलटला; परंतु ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही आणि या दोघी निराधार मायलेकीनेदेखील कुणापुढे हात पसरविले नाही.

भाकरी-पोळ्या तयार करणारी वयोवृद्ध म्हातारी काही दिवसांपासून दिसत नसल्याचे पोलीस ठाण्यातील कर्मचारी अतुल भोयर, राहुल देशमुख यांच्या लक्षात आले. त्यांनी माहिती घेतली असता, त्यांना त्या आजीबाईची खानावळ आगीत खाक झाल्याचे दिसून आले. त्यांनी म्हातारीची भेट घेऊन माहिती घेतली आणि तिची आपबिती ऐकून ‘खाकी’तील माणुसकी जागी झाली. अतुल भोयर, राहुल देशमुख यांनी आपल्या काही पोलीस मित्रांना याची माहिती दिली. दरम्यान अमोल बर्डे, स्वप्नील निकुरे, गुहरक्षक अंकुश दरोई आदींनी आपापल्या परीने मदत करून ३० ते ३५ हजारांची रक्कम जमा करून नव्याने निराधार म्हातारीला झुणका-भाकर व्यवसाय उभा करून दिला. त्यामुळे पुन्हा या माय-लेकींना उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा झाला.

काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. एक मुलगी आहे तिचे पालनपोषण करावे लागते. निराधाराचे पैसे मिळतात; पण तेवढ्यावर उपजीविका चालत नाही. त्यामुळे १० वर्षांपासून पोलीस ठाण्यासमोर पोळ्या, भाकरी करून छोटी खानावळ चालवते; मात्र अचानक एक दिवस आग लागल्याने सर्व जळून गेले; मात्र त्यानंतर राहुल देशमुख, अतुल भोयर आणि काही पोलीस दादा देवदूतासारखे धावून येत त्यांनी मदत करून नवीन व्यवसाय उभा करून दिला. त्यांनीच त्याचे नाव महाराष्ट्र झुणका-भाकर केंद्र ठेवले.

रेश्मा सावरकर, निराधार महिला.

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिस