शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंदोरीत २२ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:03 IST

तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली.

ठळक मुद्देशिळे अन्न खाल्ल्याने उलटी व हगवण : एकाच कुटुंबातील ११ जणांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली. सर्वांना उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यातील तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरुअसल्याचे सांगण्यात आले आहे.अंदोरीच्या इंदिरा वसाहतीतील देवराव पोहणकर यांच्याकडे महालक्ष्मी पुजनानिमित्त रविवारला जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. या कार्यक्रमातील शिल्लक राहिलेल्या अन्नाचा दुसऱ्या दिवशी सोमवारी पोहणकर परिवारासह इतरांनीही आस्वाद घेतला. ज्यांनी हे शिळे अन्न खाल्ले त्या सर्वांनाच मंगळवारच्या पहाटे थंडी वाजुन ताप आला. तसेच उलट्या व हगवणीचाही त्रास सुरु झाला.पोहणकर कुटुंबियांतील एका पाठोपाठ अकरा जणांमध्ये ही लक्षणे दिसून येऊ लागली. तसेच इतर परिवारातील सदस्यांनाही हा त्रास सुरु झाल्याने प्रारंभी खासगी डॉक्टरला बोलावून उपचार करण्यात आले. त्यानंतरही आराम होत नसल्याने सर्वांना आरोग्य उपकेंद्रात दाखल करुन सलाईन लावण्यात आली. पण, परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने सर्वांना बुधवारच्या मध्यरात्री सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.बाधितांमध्ये यांचा समावेशविषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये पोहणकर परिवारातील देवराव पोहणकर, हनुमंत पोहणकर, साक्षी पोहणकर, मोनाली पोहणकर, आदित्य पोहणकर, सचिन पोहणकर, कल्पना पोहणकर, दीपा पोहणकर, छबु पोहणकर, देविदास पोहणकर, कौसल्य पोहणकर तसेच गायत्री निरघुडे, अर्चना खोकले, ऋषिकेश खोकले, नंदा भोयर, गुलाब ढगे, कुसुम ढगे, रुबीना आगवान, साहीन आगवान, वर्षा चौधरी, हनुमंत चौधरी, कविता चौधरी यांचा समावेश आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुख्यालयाला दांडी; सुविधांचा अभावअंदोरी येथील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्वेता थूल व दोन परिचारीका कार्यरत आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी थूल व एक परिचारीका वर्धेवरुन ये-जा करतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांची उपकेंद्रात हजेरी राहत नाही. एका शिकाऊ परिचारीकेच्या भरवश्यावरच रात्री उपकेंद्राचे कामकाज चालते.परिणामी रात्रीच्यावेळी आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास रुग्णांना सेवाग्राम किंवा सावंगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते.त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी गावकºयांकडून करण्यात आली आहे.आरोग्य विभागाची उडाली धावपळअंदोरीत गावात विषबाधा झाल्याची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय चमू गावात दाखल झाली. एकाच वेळी २२ जणांना विषबाधा झाल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली. त्यांनी अन्नाचे व पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. तसेच रुग्णांवर उपचारही सुरु केले असून इतरही रुग्णांचा शोध सुरु आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर