शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दु:खितांच्या वेदनांवर कवितांची फुंकर

By admin | Updated: May 23, 2017 01:06 IST

कवी हा अत्यंत संवेदनशील व हळव्या मनाचा कलावंत असतो. सभोवतालच्या दु:ख, दैन्य, दारिद्र्याशी एकरूप होऊन आपली भावनिक अभिव्यक्ती तो प्रकट करीत असतो.

कविसंमेलन : राष्ट्रीय कवी कला मंचाचा अभिनव उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कवी हा अत्यंत संवेदनशील व हळव्या मनाचा कलावंत असतो. सभोवतालच्या दु:ख, दैन्य, दारिद्र्याशी एकरूप होऊन आपली भावनिक अभिव्यक्ती तो प्रकट करीत असतो. दु:खितांच्या असह्य वेदनांवर फुंकर घालण्याचे कार्य त्यांच्या काव्यमय शब्दांनी केले जाते. असाच प्रत्यय कुष्ठरोगी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर त्यांना भावनिक आधार देण्यासाठी व आत्मिक बळ देण्यासाठी आयोजित कवी संमेलनात आला. स्थानिक राष्ट्रीय कवी कला मंचाच्यावतीने महारोगी सेवा समिती दत्तपूर येथे आगळ्या-वेगळ्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. करुणाकरण तर अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. गिरीश्वर मिश्र, ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील, साहित्यिक प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. प्रमोद नारायणे, कलामंचचे संयोजक रमेश खुरगे उपस्थित होते. यावेळी जयश्री कोटगीरवार या कवयित्रीने ‘शेतकरी बापा’ ही कविता सादर केली. ‘मरणं लई सोपं बापा, जगणं आहे हिमतीच, हातात घेऊ हात आपण, जीवन लाख किंमतीचं’ असा आधार शेतकरी बापाला दिला. सुनील सावध यांनी ‘चुल पाहे विस्तवाची वाट, शेतकऱ्यांचे मुल पाहे भाकरीचे ताट’ या ओळीतून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे चित्रण केले. प्रा. प्रमोद नारायणे यांनी किती संकटे आली गेली, किती कोसळले घाट उभे, हिमालयाच्या शिखरावरती पुन्हा एकदा चढून पाहू ही माणसाला हिंमतीने जगणे शिकविणारी कविता सादर करीत उपस्थितांमध्ये जोश आणला. मिरा इंगोले यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान कवितेतून मांडले, दत्तानंद इंगोले या कवीने हिमालयाची उत्तुंगता वाढत असली तरी, माणसा-माणसातच द्वेषभाव पेरीत जाणारा हा देश! अशी व्यथा व्यक्त केली. रमेश खुरगे यांनी ‘जमीन को बेच के सरकारी काम कर रहा हूं, झुठे झुठे आकडे रेकॉर्ड कर रहा’ ही भ्रष्टाचारावर आधारित हिंदी रचना सादर केली. प्रा. अरविंद पाटील यांनी ‘बेमुदत पावसाचा संप’ या कवितेतून’ विनाकारण पाऊसही करतो राजकारण, शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतो पाणी विनाकारण’ असे चित्र उभे केले. याप्रसंगी प्रशांत ढोले, संजय भगत, स्कर्मिश खडसे, प्रभाकर पाटील, सुरेश मेश्राम, प्रा. जनार्दन दंदगाळे, भास्कर नेवारे, प्रा. प्रफुल बन्सोड, वंदना कोल्हे, गणेश वाघ, सुरेश सत्यकार, वसंत करोडे, गिरीश उरकुडे आदी कविंनी भावस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. बहिरशेट यांनी बासरीवादन सादर केले. प्रास्ताविक व भूमिका खुरगे यांनी विषद केली. परिचय डॉ. विद्या कळसाईत यांनी करून दिला. संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तर आभार प्रा. नारायणे यांनी मानले.