शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

दु:खितांच्या वेदनांवर कवितांची फुंकर

By admin | Updated: May 23, 2017 01:06 IST

कवी हा अत्यंत संवेदनशील व हळव्या मनाचा कलावंत असतो. सभोवतालच्या दु:ख, दैन्य, दारिद्र्याशी एकरूप होऊन आपली भावनिक अभिव्यक्ती तो प्रकट करीत असतो.

कविसंमेलन : राष्ट्रीय कवी कला मंचाचा अभिनव उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कवी हा अत्यंत संवेदनशील व हळव्या मनाचा कलावंत असतो. सभोवतालच्या दु:ख, दैन्य, दारिद्र्याशी एकरूप होऊन आपली भावनिक अभिव्यक्ती तो प्रकट करीत असतो. दु:खितांच्या असह्य वेदनांवर फुंकर घालण्याचे कार्य त्यांच्या काव्यमय शब्दांनी केले जाते. असाच प्रत्यय कुष्ठरोगी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर त्यांना भावनिक आधार देण्यासाठी व आत्मिक बळ देण्यासाठी आयोजित कवी संमेलनात आला. स्थानिक राष्ट्रीय कवी कला मंचाच्यावतीने महारोगी सेवा समिती दत्तपूर येथे आगळ्या-वेगळ्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. करुणाकरण तर अतिथी म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. गिरीश्वर मिश्र, ज्येष्ठ कवी प्रभाकर पाटील, साहित्यिक प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. प्रमोद नारायणे, कलामंचचे संयोजक रमेश खुरगे उपस्थित होते. यावेळी जयश्री कोटगीरवार या कवयित्रीने ‘शेतकरी बापा’ ही कविता सादर केली. ‘मरणं लई सोपं बापा, जगणं आहे हिमतीच, हातात घेऊ हात आपण, जीवन लाख किंमतीचं’ असा आधार शेतकरी बापाला दिला. सुनील सावध यांनी ‘चुल पाहे विस्तवाची वाट, शेतकऱ्यांचे मुल पाहे भाकरीचे ताट’ या ओळीतून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे चित्रण केले. प्रा. प्रमोद नारायणे यांनी किती संकटे आली गेली, किती कोसळले घाट उभे, हिमालयाच्या शिखरावरती पुन्हा एकदा चढून पाहू ही माणसाला हिंमतीने जगणे शिकविणारी कविता सादर करीत उपस्थितांमध्ये जोश आणला. मिरा इंगोले यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान कवितेतून मांडले, दत्तानंद इंगोले या कवीने हिमालयाची उत्तुंगता वाढत असली तरी, माणसा-माणसातच द्वेषभाव पेरीत जाणारा हा देश! अशी व्यथा व्यक्त केली. रमेश खुरगे यांनी ‘जमीन को बेच के सरकारी काम कर रहा हूं, झुठे झुठे आकडे रेकॉर्ड कर रहा’ ही भ्रष्टाचारावर आधारित हिंदी रचना सादर केली. प्रा. अरविंद पाटील यांनी ‘बेमुदत पावसाचा संप’ या कवितेतून’ विनाकारण पाऊसही करतो राजकारण, शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतो पाणी विनाकारण’ असे चित्र उभे केले. याप्रसंगी प्रशांत ढोले, संजय भगत, स्कर्मिश खडसे, प्रभाकर पाटील, सुरेश मेश्राम, प्रा. जनार्दन दंदगाळे, भास्कर नेवारे, प्रा. प्रफुल बन्सोड, वंदना कोल्हे, गणेश वाघ, सुरेश सत्यकार, वसंत करोडे, गिरीश उरकुडे आदी कविंनी भावस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. बहिरशेट यांनी बासरीवादन सादर केले. प्रास्ताविक व भूमिका खुरगे यांनी विषद केली. परिचय डॉ. विद्या कळसाईत यांनी करून दिला. संचालन रामेश्वर भोपळे यांनी केले तर आभार प्रा. नारायणे यांनी मानले.