शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सांगा मॅडम, शिकायचे कसे अन् बसायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:01 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या  विवंचनेमुळे  ‘प्रश्नचिन्ह’  शाळेत  शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानदानच बंद झाले आहे. शाळेत बसायला अन् शिकायलाही जागा नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या कानाकोपऱ्यातून, वीटभट्ट्याहून, दुर्गम पाड्यातून शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांची आश्रमशाळा  समृद्द्धी महामार्गात जमीनदोस्त झाली. त्यामुळे आता शिकायचे कुठे अन् बसायचे कुठे, असे  भलेमोठे ‘प्रश्नचिन्ह’ त्यांच्यासमोर उभे ठाकले. तेच प्रश्नचिन्ह घेऊन ते चिमुकले आपल्या पालकांसमवेत  शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारत, वाचानालय समृद्द्धी महामार्गात उद्ध्वस्त झाली. परिणामी या शाळेला इमारत नाही. वाचानालय नाही. या  विवंचनेमुळे  ‘प्रश्नचिन्ह’  शाळेत  शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानदानच बंद झाले आहे. शाळेत बसायला अन् शिकायलाही जागा नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शासनाने आता प्रश्नचिन्ह शाळेला पक्की इमारत, वाचनालय व अन्य सोई-सुविधा नव्याने बांधून द्यावी. या प्रमुख मागणीसाठी  विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले अन् याच परिसरात शाळा भरून  आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, यावेळी प्रतिभा भोसले, रातराणी भोसले, नुरदास भोसले, नलू पवार, वंदना पवार, अधिन भोसले  आदींच्या शिष्टमंडळाने  मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी  पवनीत कौर यांना दिले. यावर योग्य कार्यवाहीचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याने आंदोलन निवळले.दरम्यान, वंचित घटकातील या  विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने केलेल्या अभिनव आंदोलनाकडे नागरिकांचेही लक्ष वेधले. 

‘हीच प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’समृद्द्धी महामार्गामुळे जमीनदोस्त झालेली इमारत व अन्य सोई-सुविधा नव्याने बांधून द्यावी, याकरिता  थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भरलेल्या शाळेत राष्ट्रगीत, संविधान  प्रस्तावनेचे वाचन करीत ‘हीच प्रार्थना अन् हेच आमचे मागणे’ ही प्रार्थना गात उपस्थितांचे लक्ष वेधले. 

काय आहेत मागण्या?- मंगरूळ चव्हाळा येथील समृद्द्धी महामार्गात प्रश्नचिन्ह शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे  शाळेला नवीन पक्की इमारत,  मुुलाकरिता प्रसाधनगृह, स्नानगृह, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, फर्निचरसह  वाचनालय बांधून द्यावे, शाळेच्या जुन्या इमारतीलगतची शासनाची ई-क्लास जमीन शैक्षणिक प्रकल्पाकरिता विशेष बाब म्हणून कायदेशीर हस्तांतरित करावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारी