शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

पिंपळझरी बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:23 PM

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

ऑनलाईन लोकमतवर्धा /रोहणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. या भागात सुमारे अर्धा तास गार पडल्याने हिरवी शेती, काळी जमीन आणि रस्ते गारांची आच्छादल्याचे दिसून आले. या गारांच्या माऱ्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. समुद्रपूर तालुक्यातील पारोधी येथे वीज कोसळल्याने गाय व बैलाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी गारपीट झाल्यानंतर सांयकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रोहण्यालगतच्या पिंपळझरी गावाला चांगलाच तडाखा बसला. येथील नागरिकांच्या घरावरील छत उडाली. अनेकांच्या भिंती कोसळल्या, तर आकोली भागात झाडे उन्मळून पडली. या नुकसानीच्या भपाईकरिता नागरिक रस्त्यावर आले. वर्धेत दिवसभर पावसाची हजेरी होती. मात्र रात्री पावसासह आलेल्या गारांमुळे सर्वांनाच भांबावून सोडले.१२ फेब्रुवारीची सायंकाळ रोहणा परिसरात पिंपळझरी गावाकरिता काळच ठरली. यावेळी अचानक आलेल्या पावसासह वादळी वारा आणि गारपीटीमुळे हे गाव पुरते उद्ध्वस्त झाले. गावातील सर्वच घरांची मोडतोड होवून साहित्य अस्ताव्यस्त झाले. पाच-सात व्यक्तीं व जनावर जखमी झाले. विद्युत खांब उन्मळून पडल्याने ग्रामस्थांना काळोखाचा सामना करावा लागला.रोहणा परिसरातील रोहणासह मारडा, सालदरा, वाई, बोदड, बोथली या गावांना गारपीटीने अक्षरश: झोडपून काढले. यात पिंपळझरी या आदिवासी बहुल गावाला जबरदस्त फटका बसला. आज या गावात राहण्याकरिता घर व जेवणासाठी अन्न नसल्याचे चित्र आहे. गावात कोलाम या आदिवासी समाजाची ४५ ते ५० घरे आहेत. ही सर्व घरे उडून गेलीत. घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले. प्रभाकर राड्डी, चंद्रमुखी राड्डी, दिवाकर शिरबंदी, निर्मला शिरबंदी, हरिदास राड्डी, दिनेश कुंडी, दमडू घरगडी यांच्यासह त्यांची जनावरे जखमी झाली. गावात सर्वत्र आक्रोश आहे. शेतातील गहू, चणा, कापूस ही पूर्णत: नष्ट झाली आहे. सदर घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते माजी जि.प. सदस्य तथा विद्यमान जि.प. सदस्य ज्योती निकम यांचे पती गजानन निकम यांनी पिंपळझरी येथील संपूर्ण गावकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली. तर रोहणा येथील सकस आहार या वस्तीतील नागरिकांना ब्लँकेट वाटप केले. जखमींना आर्वी येथील दवाखान्यात पाठविण्यासाठी माजी सरपंच गणेश गजकेश्वर यांनी धावपळ केली. पीडितांना सहकार्य करण्यासाठी पिंपळधरीच्या सरपंचा चंदा दौलत कुंडी, रोहण्याचे सरपंच सुनील वाघ, माजी जि.प. सदस्या तृप्ती पावडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पावडे यांनी सहकार्य केले. शासनातर्फे नायब तहसीलदार मस्के यांनी गावाला भेट दिल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी तलाठी ऐकापुरे घटनास्थळी येवून नुकसानीची पाहणी करीत होते.देवळी तालुक्याला सर्वाधिक फटकानाचणगाव - सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीचा फटका देवळी तालुक्यातील सेंदरी, सोनोरा, कांदेगाव, इंझाळा, नाचणगाव, आपटी, वाघोली, विजयगोपाल, कोळोणा या गावांना मोठ्या प्रमाणात बसला. य गारपीटीमुळे गहू, चना व इतर भाजीपिकांना चांगलाच फटका बसला. खरीप पाठोपाठ रबी हंगामानेही शेतकऱ्यांच तोंडचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिसकावून नेल्याने तो हवालदिल झाला. तालुक्याला बसलेल्या गारींच्या फटक्याची पाहणी खासदार रामदास तडस यांनी सेंदरी या गावाला भेट देत केली.पक्ष्यांनाही गारांचा माराया गारपिटीचा तडाखा शेतशिवारांसह पक्ष्यांनाही बसला आहे. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी झाले तर काहींना प्राण गमवावे लागले आहे.

टॅग्स :Rainपाऊस