शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

तूर घसरली, चणा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:35 IST

शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून

सप्टेंबर अखेरीस तूर सरासरी ६,७४० तर चण्याच्या भावात ८,५०० रुपयांपर्यंत वाढरूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून त्या तुलनेत चण्याचे दर चढत असल्याचे दिसत आहे. आज कधी नव्हे तेवढे चण्याचे दर चढले आहे. चणा सरसरी ८ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. यामुळे यंदाच्या हंगामात चण्याचा पेरा करणाऱ्यांना चांगलाच लाभ झाल्याचे दिसत आहे. गत हंगामात तूर १३ हजार रुपयांवर पोहोचली होती. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यात तूर ७ हजार रुपयांवरच आहे. सध्या असलेले दर वाढतीलच असे संकेतही बाजारात नाही. गत सहा महिन्यात तुरीच्या दरांचा विचार केल्यास ते पडतच असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धा बाजार समितीत ८ हजार ६०० रुपयांनी खरेदी झालेली तूर आज सात हजार रुपयांवर आली आहे. हिच अवस्था जिल्ह्यातील मोठी बाजार समिती म्हणून नाव असलेल्या हिंगणघाट समितीची आहे. येथे ७ हजार ६९० रुपयांपासून सुरू झालेली खरेदी आज ७ हजार २५ रुपयांवर आली आहे. तुरीच्या तुलनेत महिन्याकाठी मात्र चन्याच्या दरात वाढच होत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात ४ हजार ६०० रुपयांपासून खरेदी सुरू झालेला चना आज वाढत जावून ८ हजार ५५० रुपयांवर स्थिरावला आहे. हिच स्थिती हिंगणघाट बाजार समितीची आहे. यंदा ज्या शेतकऱ्यांकडे चणा होता त्यांनी हंगाम साधल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. गत वर्षी तुरीच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ होता. यंदा तो लाभ चण्याचे उत्पन्न घेण्याऱ्या शेतकऱ्यांना झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात तुरीच्या तुलनेत चण्याचे पीक घेणारे शेतकरी कमी असल्याने वाढीव भावाचा जिल्ह्याला विशेष लाभ झाला नसल्याचे बोलले जात आहे. वर्धा बाजार समितीचा विचार केल्यास गत सहा महिन्यात एकूण १६ हजार १५० क्विंटल चण्याची आवक झाली आहे तर तुरीची २१ हजार १२७ क्विंटल झाली आहे. गरजू नाही तर साठेबाज शेतकऱ्यांनाच दरवाढीचा लाभगत सहा महिन्यांपासून चन्याचे दर वाढतच आहे. याचा ल् ााभ गरजवंत शेतकऱ्यांना होण्याऐवजी साठेबाज शेतकऱ्यांनाच होणार असल्याचे दिसून आले आहे. रबीत घेतलेला चना विकून शेतकऱ्यांनी नवा खरीप साजरा केला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडील चना ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांत विकल्या गेला. आज शेतकऱ्यांकडे चना नसताना बाजारात ८ हजार ५०० रुपये दर आहे. याचा लाभ शेतकऱ्यांन नाही तर साठेबाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी तुरी पडून गत हंगामात तुरीचे दर वाढले होते. यंदाही तुरीचे दर वाढतील असा अंदाज शेतकऱ्यांना होता. यामुळे काही सधन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तुरीचा साठा करून ठेवला होता. दर वाढताच तूर विकण्याचा त्यांचा मानस होता. मात्र यंदाच्या हंगामात तुरीचे दर वाढण्याऐवजी ते घसरत असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धेत ८ हजार ६०० तर हिंगणघाट बाजार समीतीत ७ हजार ६९० रुपये असलेले दर सप्टेंबर अखेर वर्धा बाजार समितीत ६ हजार ७४० तर हिंगणघाट येथे ६ हजार ३८३ रुपयांचवर गडगडले आहे. येत्या महिन्यात दिवाळसण आहे. या काळात शेतकऱ्यांचे सोयाबीन निघते. त्या काळात सोयाबीनला दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र ती दर वर्षीच फोल ठरत आली आहे. यंदाही तसेच होण्याची शक्यता आहे.