शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

तूर घसरली, चणा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:35 IST

शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून

सप्टेंबर अखेरीस तूर सरासरी ६,७४० तर चण्याच्या भावात ८,५०० रुपयांपर्यंत वाढरूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून त्या तुलनेत चण्याचे दर चढत असल्याचे दिसत आहे. आज कधी नव्हे तेवढे चण्याचे दर चढले आहे. चणा सरसरी ८ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. यामुळे यंदाच्या हंगामात चण्याचा पेरा करणाऱ्यांना चांगलाच लाभ झाल्याचे दिसत आहे. गत हंगामात तूर १३ हजार रुपयांवर पोहोचली होती. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यात तूर ७ हजार रुपयांवरच आहे. सध्या असलेले दर वाढतीलच असे संकेतही बाजारात नाही. गत सहा महिन्यात तुरीच्या दरांचा विचार केल्यास ते पडतच असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धा बाजार समितीत ८ हजार ६०० रुपयांनी खरेदी झालेली तूर आज सात हजार रुपयांवर आली आहे. हिच अवस्था जिल्ह्यातील मोठी बाजार समिती म्हणून नाव असलेल्या हिंगणघाट समितीची आहे. येथे ७ हजार ६९० रुपयांपासून सुरू झालेली खरेदी आज ७ हजार २५ रुपयांवर आली आहे. तुरीच्या तुलनेत महिन्याकाठी मात्र चन्याच्या दरात वाढच होत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात ४ हजार ६०० रुपयांपासून खरेदी सुरू झालेला चना आज वाढत जावून ८ हजार ५५० रुपयांवर स्थिरावला आहे. हिच स्थिती हिंगणघाट बाजार समितीची आहे. यंदा ज्या शेतकऱ्यांकडे चणा होता त्यांनी हंगाम साधल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. गत वर्षी तुरीच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ होता. यंदा तो लाभ चण्याचे उत्पन्न घेण्याऱ्या शेतकऱ्यांना झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात तुरीच्या तुलनेत चण्याचे पीक घेणारे शेतकरी कमी असल्याने वाढीव भावाचा जिल्ह्याला विशेष लाभ झाला नसल्याचे बोलले जात आहे. वर्धा बाजार समितीचा विचार केल्यास गत सहा महिन्यात एकूण १६ हजार १५० क्विंटल चण्याची आवक झाली आहे तर तुरीची २१ हजार १२७ क्विंटल झाली आहे. गरजू नाही तर साठेबाज शेतकऱ्यांनाच दरवाढीचा लाभगत सहा महिन्यांपासून चन्याचे दर वाढतच आहे. याचा ल् ााभ गरजवंत शेतकऱ्यांना होण्याऐवजी साठेबाज शेतकऱ्यांनाच होणार असल्याचे दिसून आले आहे. रबीत घेतलेला चना विकून शेतकऱ्यांनी नवा खरीप साजरा केला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडील चना ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांत विकल्या गेला. आज शेतकऱ्यांकडे चना नसताना बाजारात ८ हजार ५०० रुपये दर आहे. याचा लाभ शेतकऱ्यांन नाही तर साठेबाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी तुरी पडून गत हंगामात तुरीचे दर वाढले होते. यंदाही तुरीचे दर वाढतील असा अंदाज शेतकऱ्यांना होता. यामुळे काही सधन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तुरीचा साठा करून ठेवला होता. दर वाढताच तूर विकण्याचा त्यांचा मानस होता. मात्र यंदाच्या हंगामात तुरीचे दर वाढण्याऐवजी ते घसरत असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धेत ८ हजार ६०० तर हिंगणघाट बाजार समीतीत ७ हजार ६९० रुपये असलेले दर सप्टेंबर अखेर वर्धा बाजार समितीत ६ हजार ७४० तर हिंगणघाट येथे ६ हजार ३८३ रुपयांचवर गडगडले आहे. येत्या महिन्यात दिवाळसण आहे. या काळात शेतकऱ्यांचे सोयाबीन निघते. त्या काळात सोयाबीनला दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र ती दर वर्षीच फोल ठरत आली आहे. यंदाही तसेच होण्याची शक्यता आहे.