शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

पेट्रोलचा ट्रँकर धडकला रेल्वे फाटकावर; मध्य रेल्वेची अप लाईन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 17:40 IST

एका पेट्रोलच्या टँकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिली. धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

ठळक मुद्देमालगाडी ३ तास उभी करावी लागली वर्धा रेल्वे स्थानकावर

वर्धा : चिकणी (जामणी) नजीकच्या निमगाव शिवारात नायरा कंपनीला पेट्रोल डेपो आहे. याच पेट्रोल डेपाेतून संपूर्ण विदर्भासह छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा केला जात असून या डेपोत जाणाऱ्या एका पेट्रोलच्या टँकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिली.

धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नाअंती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीला वर्धा रेल्वे स्थानकावरच तीन तास थांबवावे लागले. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या टँकर चालकाविरुद्ध रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच अपघातग्रस्त टँकरही जप्त करण्यात आला आहे.

अशी घडली घटना

बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आंबोडा चौकी येथील रेल्वे फाटक अर्धवट उघडताच एमएच ३४- बीजी ५७६८ क्रमांकाचा टँकर चालक विठ्ठल मोरे याने त्याच्या ताब्यातील टँकर नायरा कंपनीत नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान टँकरचा काही भाग रेल्वे फाटकाच्या लोखंडी खांबाला धडकला. अशातच हा लोखंडी खांब तुटून थेट रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणाऱ्या प्रवाहित विद्युत तारेवर पडला. त्यामुळे विद्युत वाहिनी तुटल्याने रेल्वे विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.

रेल्वे विभागाला ७५ हजारांचा फटका

मुख्य विद्युत वाहिनी तुटल्याची माहिती मिळताच वर्धा रेल्वे स्थानकाचे प्रबंधक डी. एस. ठाकूर, आर. सी. भारती तसेच ५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दुरुस्तीचे काम सुरू केले. तब्बल तीन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यास यश आले आहे. असे असले तरी या घटनेमुळे रेल्वे विभागाला ७५ हजारांहून अधिकचा फटका बसला आहे.

३ तासांनंतर सुरळीत झाली रेल्वे वाहतूक

तब्बल ३ तासानंतर नागपूर-मुंबई मध्यरेल्वेच्या अपलाईनचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे दुपारी १.३० ते दुपारी ४.५८ वाजेपर्यंत नागपूरकडून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

नायराच्या अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाहीच

या प्रकरणी नायरा कंपनी प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी नायराचे अधिकारी जाधव यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

नायरा कंपनी जवळील अपघातामुळे नागपूर-मुंबई या मध्य रेल्वेची अप लाईन प्रभावित झाली होती. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या एका मालगाडीला वर्धा रेल्वे स्थानकावरच थांबवावे लागले. दुपारी ४ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर मालगाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

- डी. एस. ठाकूर, प्रबंधक, रेल्वे स्थानक, वर्धा

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वे