शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अन् 'ते' तहसीलच्या पायऱ्यांवर बसले भजनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 13:36 IST

मागील आठ वर्षांपासून सेलू येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून कुठलीही सोय सुविधा उपलब्ध नसलेल्या किरायाच्या इमारतीतून तहसीलचे कामकाज सुरू आहे.

ठळक मुद्देकिसान अधिकारचे आंदोलन : नव्या इमारतीत कामकाज सुरू करण्याची मागणी

वर्धा : मागील आठ वर्षांपासून सेलू येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून कुठलीही सोय सुविधा उपलब्ध नसलेल्या किरायाच्या इमारतीतून तहसीलचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे तहसील कार्यालय हक्काच्या इमारतीत स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी किसान अधिकार अभियानकडून तहसीलसमोर भजन आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

तहसील कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश करणाऱ्या पायऱ्यांवर किसान अधिकार अभियानने भजन आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत इमारत स्थालांतरित होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

२०१३ मध्ये जुने तहसील कार्यालय पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले. या इमारतीचे बांधकाम २०१५ पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, संथ गतीने सुरू असलेले हे काम पाहून अद्याप इमारत पूर्ण होण्यास किती वर्षे लागणार, हा संशोधनाचा विषय बनला आहे. आठ वर्षांहून अधिक काळापासून तहसील कार्यालय हे किरायाच्या इमारतीत पहिल्या माळावर आहे.

या ठिकाणी महिला कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्यांना साधी शौचालयाची व्यवस्था नाही. तसेच बसण्याची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी आदी सुविधा नाही. वयोवृद्ध नागरिकांना पायऱ्या चढून जाताना करावे लागणारे कष्ट हे तालुक्यासाठी योग्य नाही. यापूर्वी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नवीन इमारतीत जोपर्यंत हे कार्यालय हलविले जात नाही तोपर्यंत कार्यालयाच्या पायऱ्यांवर भजन आंदोलन करण्याचा निर्धार किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, विठ्ठल झाडे, गजानन गिरडे, राहुल पोकळे, विजय भांडेकर,एकनाथ बरबडीकर, दिलीप भट, मनोहर तेलरांधे आदींनी केला आहे.

आणखी किती दिवस चालणार आंदोलन?

अद्यापही नव्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार असून आंदोलनकर्त्याची मागणी पूर्ण होईपर्यंत दररोज भजन आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. आता प्रशासन हे आंदोलन कसे थांबविणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agitationआंदोलनGovernmentसरकार