शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

आर्थिक मंदीच्या सावटाने जनता त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:25 IST

भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते.

ठळक मुद्देनाना पटोले : काँग्रेसची महापर्दाफाश जनसभेतून भाजपावर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देशात आर्थिक मंदीचे सावट असून नैसर्गीक आपत्तीमुळे जनता त्रस्त आहे. अशाही परिस्थितीत सर्व सामान्यांच्या भावानांची खिल्ली उडवली जात आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करित भाजपा महाजनादेश यात्रा काढून राज्यभर मतांची भीक मागत आहे, अशी घणाघाती टिका प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी केला.भाजप सरकारची पोलखोल करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात गुरुकुंज मोझरी येथून निघालेली काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा पुलगावात आली होती. यावेळी संबोधित करताना माजी खासदार नाना पटोले बोलत होते. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, आमदार रणजित कांबळे व शहराध्यक्ष सुनील ब्राह्मणकर आदींची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप-सेना युतीच्या सरकारने पाच वर्षात शेतकरी व सामान्य माणसाच्या प्रश्नांना बगल देवून जनतेची फसवणूक केली. सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. भाषणबाजी करण्यात पटाईत असलेले भाजपाचे नेते भाषणातून आभासी जग निर्माण करतात. नागरिकांना नवनवीन स्वप्न दाखवून त्यांची दिशाभूल केली जात आहे. या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण, अद्यापही शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. या शासनाने नोकर भरती बंद केल्याने बेरोजगारीची समस्या वाढली आहे. हल्ली सर्व युवकांना आॅनलाइमध्ये उभे केले आहे. त्यामुळे या देशाची भावी पिढी देशोधडीला लागली आहे. नवीन उद्योगांची निर्मिती होत नसून असलेल्या कंपन्याही बंद होण्याच्या मार्गावर आहे. दररोज कोणती ना कोणती कंपनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबत आहे. तरीही विकास केल्याच्या बाता हे सरकार करित असल्याचे थोरात म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार रणजित कांबळे यांनी तर संचालन रमेश सावकर यांनी केले.भाजपा नेत्यांवर जादुटोणा केल्याचा आरोप हास्यास्पदवर्धा: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते पडद्याआड झाले; ही दु:खद बाब आहे. पण, या घटनेचेही भांडवल केले जात आहे. विरोधकांनी जादुटोणा केल्यामुळेच त्यांचे जीव गेल्याचा आरोप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, करीत असून तो हास्यास्पद आहे, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार नाना पटोले यांनी वर्ध्यातील महापर्दाफाश यात्रेदरम्यान केली. पुलगाव येथील जनसभा आटोपून रात्री साडेनऊ वाजतादरम्यान ही यात्रा वर्ध्यात पोहोचली. शिवाजी चौकात या यात्रेचे स्वागत केल्यानंतर ही यात्रा सभास्थळी आली. यावेळी नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. केंद्रात शहा-तानाशहा आहे तर इकडे फसवनीस असल्याने सर्वसामान्यांसह शेतकºयांची वाट लागली आहे. मुख्यमंत्री सध्या दौºयावर असून त्यांना पूरग्रस्तांची काही चिंता नाही. त्यांच्या कार्यालयात महिन्याकाठी ५० कोटीचा खर्च केल्या जातो. सर्वसामान्यांच्या पैशातून जनादेश यात्रा काढली जाते. पुरपरिस्थितीबाबत बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणातात की, आम्हाला इतक्या पावसाचा अंदाजच नव्हता. मग त्यांना २२० जागांचा अंदाज कसा लावता येतो? असा प्रश्न पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच उज्ज्वला योजनेतून गॅसचे वाटप करुन गरजावंतानाही या सरकारने श्रीमंतांच्या यादीत नेऊन टाकले. त्यामुळे येत्या २०२१ च्या जनगणनेत आपोआप या सर्वांची नावे बीपीएल यादीतून नाहीसे होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव शेखर शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाला सेवक वाघाये, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष हेमलता मेघे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, शहराध्यक्ष सुधीर पांगुळ, इंद्रकुमार सराफ, रामभाऊ सातव, राजेंद्र शर्मा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हिवरे यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस