शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 15, 2014 23:44 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही

कारंजा (घा.) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आली नसून याचा फटका मात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.जानेवारी २०१४ मध्ये संजय गांधी निराधार समितीची सभा झाली. त्यात फक्त संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे निकालात निघून त्यांचे मानधन सुरू झाले. श्रावणबाळ योजनेयील प्रकरणे प्रलंबित राहिली. त्याची नोंद आवक रजिस्टरवर आहे. त्यानंतर ग्रा.पं.व लोकसभा, विधान परिषदेची आचारसंहिता लागली. सभेची तारीख निश्चित करून सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर ३० जूनच्या आत समितीची त्रैमासिक सभा अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रलंबित व नव्याने सादर झालेली प्रकरणे निकालात काढणे गरजेचे आहे. बीपीएलमधील श्रावणबाळ लाभार्थी वगळता संजय गांधी निराधार व नॉन बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी यावेळी अनुदान जमा करण्यास विलंब केल्याचे कळते. मे २०१४ चे अनुदान काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून दिली जाते. बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीला तांत्रिकरित्या मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित असल्याचे समजते. २०१३ मध्ये तत्कालीन महिला तहसीलदाराच्या काळातील बरीचशी प्रकरणे प्रलंबित आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर या अधिकाऱ्यांकडे ही प्रकरणे हाताळली असताना त्यातील बरीच कागदपत्रे गहाळ झाल्याचे बोलले जाते. या संदर्भात समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच ही प्रकरणे नव्याने तपासून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत निकालात काढावयाची होती, पण त्या संदर्भातील कार्यवाही अपूर्ण राहिली. याची चौकशी करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)