शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

गाळ्यांच्या लिलावाविरूद्ध शांतता आंदोलन

By admin | Updated: November 10, 2015 02:49 IST

स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामविकास आराखड्याप्रमाणे बांधलेले दुकान गाळे नियमबाह्य लिलावाद्वारे धनदांडगे, व्यापाऱ्यांना वाटण्यात आले.

पंतप्रधानांपर्यंत तक्रार : ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेपगिरड : स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामविकास आराखड्याप्रमाणे बांधलेले दुकान गाळे नियमबाह्य लिलावाद्वारे धनदांडगे, व्यापाऱ्यांना वाटण्यात आले. यातून ग्राम-विकासाला फाटा दिल्याचा आक्षेप घेत निर्भय पांडे यांनी आंदोलन सुरू केले. आठ दिवसांपासून ग्रा.पं. समोर ठाण मांडून बसल्यावरही प्रशासनाने याकडे पाठ फिरविली आहे. जिल्हाधिकारी ते थेट पंतप्रधानांपर्यंत पांडे यांनी या प्रकरणाच्या तक्रारी केल्या आहेत. शासनाने ग्रामविकास व्हावा, या उद्देशाने मोठ्या ग्रा.पं. ला नगर विकास आराखड्याच्या धर्तीवर ग्रामविकास आराखडा जनसुविधेसाठी मंजूर केला. मंजूर ग्रामविकास आराखड्यामधून १२ गाळे बांधण्यात आले. ज्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले, त्या ठिकाणावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता अस्थायी दुकान चालविणाऱ्या गरजुंकडून पगडी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन गाळा देण्यात आला. याबाबत सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करीत आपल्या सत्तेचा दुरूयोग केल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. यानंतर उर्वरित गाळे गरजू लोकांना न देता बोली पद्धतीने नियमबाह्य लिलाव घेऊन श्रीमंतांना चार ते आठ लाख रुपयांपर्यंत देण्यात आल्याचेही त्यांचे मत आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा शांतता आंदोलन करण्याबाबत वरिष्ठांना निवेदन दिले होते; पण दखल घेतल्याने नियमबाह्य लिलाव झाला. याविरूद्ध आवाज उठविण्याकरिता ३ नोव्हेंबरपासून शांतता आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील विविध गैरप्रकार माहिती अधिकारांतर्गत उजेडात आणत आहे. त्यामुळे या आंदोलनादरम्यान माझा घातपात होऊ शकतो, अशी शक्यता पांडे यांनी वर्तविली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)