शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

गाळ्यांच्या लिलावाविरूद्ध शांतता आंदोलन

By admin | Updated: November 10, 2015 02:49 IST

स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामविकास आराखड्याप्रमाणे बांधलेले दुकान गाळे नियमबाह्य लिलावाद्वारे धनदांडगे, व्यापाऱ्यांना वाटण्यात आले.

पंतप्रधानांपर्यंत तक्रार : ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर आक्षेपगिरड : स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामविकास आराखड्याप्रमाणे बांधलेले दुकान गाळे नियमबाह्य लिलावाद्वारे धनदांडगे, व्यापाऱ्यांना वाटण्यात आले. यातून ग्राम-विकासाला फाटा दिल्याचा आक्षेप घेत निर्भय पांडे यांनी आंदोलन सुरू केले. आठ दिवसांपासून ग्रा.पं. समोर ठाण मांडून बसल्यावरही प्रशासनाने याकडे पाठ फिरविली आहे. जिल्हाधिकारी ते थेट पंतप्रधानांपर्यंत पांडे यांनी या प्रकरणाच्या तक्रारी केल्या आहेत. शासनाने ग्रामविकास व्हावा, या उद्देशाने मोठ्या ग्रा.पं. ला नगर विकास आराखड्याच्या धर्तीवर ग्रामविकास आराखडा जनसुविधेसाठी मंजूर केला. मंजूर ग्रामविकास आराखड्यामधून १२ गाळे बांधण्यात आले. ज्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले, त्या ठिकाणावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता अस्थायी दुकान चालविणाऱ्या गरजुंकडून पगडी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन गाळा देण्यात आला. याबाबत सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानता तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करीत आपल्या सत्तेचा दुरूयोग केल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. यानंतर उर्वरित गाळे गरजू लोकांना न देता बोली पद्धतीने नियमबाह्य लिलाव घेऊन श्रीमंतांना चार ते आठ लाख रुपयांपर्यंत देण्यात आल्याचेही त्यांचे मत आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा शांतता आंदोलन करण्याबाबत वरिष्ठांना निवेदन दिले होते; पण दखल घेतल्याने नियमबाह्य लिलाव झाला. याविरूद्ध आवाज उठविण्याकरिता ३ नोव्हेंबरपासून शांतता आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. जिल्ह्यातील विविध गैरप्रकार माहिती अधिकारांतर्गत उजेडात आणत आहे. त्यामुळे या आंदोलनादरम्यान माझा घातपात होऊ शकतो, अशी शक्यता पांडे यांनी वर्तविली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार रामदास तडस, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)